लोकसत्‍ता टीम

अमरावती : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला असून धर्माच्या आधारे राजकारण करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असताना आता शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनाही वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवला आहे. या सरकारने चक्क शाळा महाविद्यालयांमध्ये प्रचार सुरू केला आहे, असा आरोप काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

Who is Anjali Birla
IAS अंजली बिर्ला! लोकसभा अध्यक्षांच्या लेकीचं पहिल्याच टप्प्यातील यश का ठरतंय वादग्रस्त? चर्चेमागील सत्य जाणून घ्या!
Loksatta kalakaran Shaheen Bagh textiles J G Arts College art school
कलाकारण: रंग उतरेल का हो या कापडाचा?
Savitri Thakur Viral Video of Beti Bachao Beti Padhao
मोदींच्या मंत्रिमंडळातील महिला मंत्री ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ लिहिताना अडखळल्या, फळ्यावर काय लिहिलं एकदा वाचाच!
The beginning of the new academic year with the movement of teachers Pune
नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ शिक्षकांच्या आंदोलनाने
coaching classes get more students admission through agent in latur
शिकवणी वर्ग परिसरात दलालांचा वावर; लातूरमध्ये प्राध्यापकांच्या फोडाफोडीसाठी कमिशन,अधिकाधिक विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न
Dr Sukhdev Thorat alleges that the school curriculum is inconsistent with the principles of the Constitution
शालेय अभ्यासक्रमाचा आराखडा राज्यघटनेतील तत्त्वांशी विसंगत;  डॉ. सुखदेव थोरात यांचा आरोप, म्हणाले ‘जातीव्यवस्था हिंदूंनी नव्हेतर ब्रिटिशांनी…’
NEET, seats, passed students,
‘नीट’ परीक्षा : जागा केवळ ७८ हजार, उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येत दोन लाखाने वाढ, राज्यात ८५ टक्के जागांसाठी…
foreign scholarships,
लोकसभेतील पराभवानंतरही महायुती सरकारची मनमानी! बहुजन विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्तीपासून…

राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमातून प्रचाराचा धडाका सुरू आहे. राज्यातील जनता महागाई आणि गरिबीच्या खाईत ढकलली गेली असताना, सरकार मात्र उत्सवी राजकारणाची गोळी जनतेला देत आहे. वर्षांनुवर्ष चालत आलेल्या सण परंपरांना ‘इव्हेंट’चे स्वरूप देऊन लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांवरून बाजूला हटवण्याचा प्रकार राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने सुरू आहे. सध्या धार्मिक वातावरण निर्माण करून जनतेचे लक्ष महागाई आणि बेकारी यासारख्या प्रश्नांवरून वळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आता शाळेतील विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांना प्रचाराचा भाग बनवले जात आहे, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

आणखी वाचा-धक्कादायक! वास्तुशांतीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात चक्क होम हवन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यानिमित्ताने आपल्या पक्षाचा अजेंडा राबवत प्रचार करतात त्यांचाच कित्ता आता राज्यातील शिंदे फडणवीस पवार यांच्या सरकारने गिरवायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांसाठी राज्य सरकार कोणकोणत्या योजना राबवत आहे आणि कशाप्रकारे विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहे. याचे दोन पानी पत्र शाळा महाविद्यालयांमध्ये वितरित केले जात आहे. विशेष म्हणजे काही शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी मुख्यमंत्र्यांचे हे पत्र विद्यार्थ्यांना वितरित केले आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही प्रचाराचे साधन बनवून राज्य सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. सरकारला जर काय करायचे असेल, तर सरकारने आधी दर्जेदार शिक्षण दर्जेदार सुविधा आणि तरुणांच्या हाताला काम द्यावे. केवळ पत्रकबाजी करून प्रचार करू नये, असेही यशोमती ठाकूर यांचे म्‍हणणे आहे.