कोणत्याही पदावर असलात तरी दुसऱ्याला कधी तुच्छ लेखू नका. यातून हातात काही लागणार नाही, पण तुमचीच बर्बादी होईल असा सल्ला राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते पक्षातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रं देण्यात आली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपा, शिवसेनेचा प्रवास सांगत खचू नका असं सांगितलं.

“कोणत्याही पदावर असलात तरी दुसऱ्याला कधी तुच्छ लेखू नका. यातून हातात काही लागणार नाही, पण तुमचीच बर्बादी होईल. आज तुमच्याकडे फक्त पद आहे. दुसरी माणसं नव्हती म्हणून तुम्हाला पद दिलं असं नाही. तुम्हाला निवडून हे पद देण्यात आलं आहे. त्या पदाची जबाबदारी ओळखा. कधी कोणाला तुच्छ लेखू नका,” असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.

if Maratha society got cheated file case of fraud says Bipin Chaudhary
“मराठा समाजाला धोका दिल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करा” जरांगेंच्या आवाहनाला…
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
australian senator lidia thorpe to king charles
तुम्ही आमचे राजे नाहीत, तुम्ही आमचा नरसंहार केला! ऑस्ट्रेलियाच्या सीनेटरने ब्रिटनचे राजे चार्ल्स यांना सुनावले
mother expressed grief, child orphanage,
आई म्हणून मीच एकटी दोषी का रे!
Loksatta aaptibaar Raj Thackeray Statement on Assembly Elections 2024 winning
आपटीबार: राजसत्तेचे चित्र
Raj thackeray on Baba Siddique
Raj Thackeray : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बाहेरच्या राज्यातून…”
bjp narrative constitution
‘नॅरेटिव्ह’ नव्हे; लोकांचे मुद्दे!
Ratan Tata Died at 86 in Marathi
Raj Thackeray Letter To PM : “रतन टाटा हयात असतानाच भारतरत्न द्यायला हवा होता, पण…”, राज ठाकरेंचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

खिल्ली उडवणाऱ्यांना इशारा

“गेल्यावेळी मी दौऱ्यावर आलो, तेव्हा मनसेला पदाधिकारी मिळत नाही, अशा बातम्या आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अंजन घालावं यासाठी पदाधिकाऱ्यांना आज पत्रवाटप करण्यात आले आहे. काही पत्रकार एखाद्या पक्षासाठी वाहलेले असतात. काही जणांनी इतके वर्ष पक्षांची दलाली केली असेल, तर त्यांना दुसरा पक्ष वाढत असताना त्रास होणारच आहे. मात्र, नागपूरमधील काही पत्रकार मनसेला प्रोत्साहन देत आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.

“एखाद्या पक्षाचा विजय आणि पराभव होत राहतो. आधी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर तो भाजपाचा बालेकिल्ला झाला. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष यातून गेला आहे. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील ‘हे पोट्टं काय करणार? मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल”, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.