अकोला : मोहनदास करमचंद गांधी हे मुस्लीम पुत्रच असल्याचा पुनरुच्चार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अकोल्यात बोलताना केला. यासंदर्भातला उल्लेख असलेल्या पुस्तकातील उताऱ्याचे वाचन त्यांनी व्याख्यानात केले. करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे मोहनदास हे पुत्र आहेत. त्या पत्नीला मुस्लीम जमीनदाराने पळवून नेले होते. लव्ह जिहाद आणि त्यात काही फरक नाही, अशी वादग्रस्त टीका भिडे यांनी केली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अकोला विभागाद्वारे रविवारी सायंकाळी ओम मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. यावेळी मुस्लीम धर्माविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली. हिंदुस्थानावर खूप आक्रमणे झाली आहेत. अनेक टोळ्यांनी ५०० वर्षे गोंधळ घातला. जगात ५२ मुस्लीम राष्ट्रांपैकी ३९ देशांनी हिंदुस्तानावर आक्रमण केले आहे. ते स्वतःच्या जन्मदात्रीलादेखील आई मानत नाहीत, अशी वादग्रस्त टीका भिडे यांनी केली. ‘हिंदू देहाने जिवंत आहेत, पण मनाने मेलेले आहेत, हेच खरे दुर्दैव आहे. हिंदूंनी स्वदेशी स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही.

kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Vanchit Bahujan aghadi agitation against senior literary figure in Nagpur
नागपुरातील ज्येष्ठ साहित्यिकाच्या विरोधात वंचितचे आंदोलन, निवासस्थानी पोलीस तैनात
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
Shinde faction leader Shambhuraj Desai and Thackeray faction leader Ambadas Danve took darshan of Shrimant Dagdusheth Halwai Ganapati
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी घेतले दर्शन
Mohan Bhagwat, Chandrapur, RSS,
सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्याचा चंद्रपुरात जाहीर निषेध, आंदोलन
NCP ajit pawar group,Dharmarao Baba Atram eldest daughter join sharad pawar group
राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याच्या घरातच फूट, मुलगी लवकरच शरद पवार गटात…सोबत जावयानेही….
Sharmila Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Sharmila Thackeray : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे…”

हेही वाचा >>> “भाजपा आणि भिडेंचं साटंलोटं आहे, हे आता सिद्ध झालं”, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

स्वदेशी बाणा आत्मसात करण्याची गरज खरी गरज आहे. विदेशी उत्पादनांचे बाजारपेठेवर वर्चस्व आहे. ते देश लुटत आहेत. इंग्रज व्यापार करण्याच्या दृष्टीने आले. योजनापूर्वक त्यांनी देशावर कब्जा मिळवला. १७५ वर्षे इंग्रजांनी देशाचा अभ्यास केला होता. स्वदेशी बाणा स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे.  आपल्याला देशाचा टोकाचा अभिमान असल्याशिवाय हे घडणार नाही. हिंदूंमध्ये राष्ट्रीयत्वाचे कण कमी आहेत,’ असेही भिडे म्हणाले.

हेही वाचा >>> सोलापूर: गांधीजींचा अभिमान वाटत नसल्यास संभाजी भिड्यांनी देशातून चालते व्हावे; आमदार प्रणिती शिंदे यांची मागणी

चुकीच्या नीतीमुळे भारत-चीन युद्ध घडले. ५९ हजार सैनिक मारले गेले. या युद्धाला ६१ वर्षे होत आहेत. दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणूक होते. १२ लोकसभा निवडणुकांमध्ये चीनने घेतलेली जमीन वापस काढून घेण्याचा मुद्दा उचलावा, असे कुणालाही वाटले नाही, अशी टीका भिडे यांनी केली. मॉ जिजाऊ यांनी १४ वर्षे शिवबाला सर्वांगीण संस्कार दिले. दादाजी कोंडदेव युद्धनीतीचे धडे दिले. शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले जिंकले. अडीचपट हिंदवी स्वराज्य वाढवले. त्यांचा आदर्श ठेवून हिंदूंनी एकत्रित होऊन राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, पती, पत्नीच्या पोटी पुत्राच्या रूपाने जन्म घेतो, पत्नी स्वतःच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेते, या वक्तव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.