माणूस प्रेमात पडला की ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातो. मग ते प्रेम माणसाचे माणसासाठी असो, वा माणसाचे प्राण्यासाठी. चीन हे भारताचे शत्रुराष्ट्र, पण हेच राष्ट्र भारतीय ‘पँगोलीन’च्या प्रेमात पडले. त्याला मिळवण्यासाठी त्यांनी जीवंतच नाही तर शिकार करुन त्याला मिळवण्याचा प्रयत्न केला. गेल्या चार वर्षात १२००हून अधिक ‘पँगोलीन’ त्यांनी या ना त्या पद्धतीने आपल्या ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- सावधान! नागपूरमध्ये अद्याप लहान मुलांमध्येच गोवरचे संक्रमण; प्रौढांनी…

वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी शासनाने नियम कितीही कडक केले आणि कठोर कारवाईचा बडगा उभारला तरीही ही तस्करी मात्र थांबलेली नाही. वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत अनुसूची एकमध्ये असणारा ‘पँगोलीन’ हा प्राणीही त्यातून सुटला नाही. महाराष्ट्र हा या प्राण्यांच्या तस्करीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रॅफिक इंडिया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया या दोन्ही संस्थांनी नुकत्याच या प्राण्यांच्या तस्करीचा जाहीर केलेला अहवाल तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. गेल्या चार वर्षातील आतापर्यंतची ‘पँगोलीन’ची सर्वाधिक जप्ती ओडिशातून करण्यात आली असून त्यापाठोपाठ ती महाराष्ट्रातून करण्यात आली आहे. ३४२ जप्तीच्या घटनांमध्ये वन्यजीव व्यापारासाठी १२०३ ‘पँगोलीन’ची शिकार व तस्करी झाली आहे. त्यापैकी ओडिशातील ७४ जप्तीच्या घटनांमध्ये १५४ तर महाराष्ट्रातील ४७ जप्तीच्या घटनांमध्ये १३५ ‘पँगोलीन’चा समावेश आहे. यातील ५० टक्के घटनांमध्ये जिवंत खवले मांजरांचा समावेश आहे. ‘पँगोलीन’च्या खवल्यांचा वापर चिनी औषधांमध्ये केला जातो. त्यापासून पारंपरिक औषध तयार केले जाते.

हेही वाचा- सावधान! नागपूरमध्ये अद्याप लहान मुलांमध्येच गोवरचे संक्रमण; प्रौढांनी…

वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी शासनाने नियम कितीही कडक केले आणि कठोर कारवाईचा बडगा उभारला तरीही ही तस्करी मात्र थांबलेली नाही. वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत अनुसूची एकमध्ये असणारा ‘पँगोलीन’ हा प्राणीही त्यातून सुटला नाही. महाराष्ट्र हा या प्राण्यांच्या तस्करीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रॅफिक इंडिया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया या दोन्ही संस्थांनी नुकत्याच या प्राण्यांच्या तस्करीचा जाहीर केलेला अहवाल तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. गेल्या चार वर्षातील आतापर्यंतची ‘पँगोलीन’ची सर्वाधिक जप्ती ओडिशातून करण्यात आली असून त्यापाठोपाठ ती महाराष्ट्रातून करण्यात आली आहे. ३४२ जप्तीच्या घटनांमध्ये वन्यजीव व्यापारासाठी १२०३ ‘पँगोलीन’ची शिकार व तस्करी झाली आहे. त्यापैकी ओडिशातील ७४ जप्तीच्या घटनांमध्ये १५४ तर महाराष्ट्रातील ४७ जप्तीच्या घटनांमध्ये १३५ ‘पँगोलीन’चा समावेश आहे. यातील ५० टक्के घटनांमध्ये जिवंत खवले मांजरांचा समावेश आहे. ‘पँगोलीन’च्या खवल्यांचा वापर चिनी औषधांमध्ये केला जातो. त्यापासून पारंपरिक औषध तयार केले जाते.