लोकसत्ता टीम

चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदार संघात गेल्या तीन दिवसात दहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी केला. उन्हाच्या तीव्रतेमुळे दोन सख्या बहिणींना जीव गमवावा लागला, मात्र या उष्माघाताच्या मृत्यूंची नोंद जिल्हा प्रशासन किंवा आरोग्य विभागाने घेतली नाही, याबाबत धोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

party corporator, Chandrakant Patil,
‘ते स्वतः येत नाहीत, दुसऱ्यालाही येऊ देत नाहीत,’ मंत्री चंद्रकांत पाटलांवर पक्षाच्या नगरसेवकाचे गंभीर आरोप!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Bhosari Vidhan Sabha, Vilas Lande, Sharad Pawar group,
भोसरी विधानसभा: विलास लांडेंचं ठरलं; या दिवशी करणार शरद पवार गटात प्रवेश; मुलानेच दिली माहिती
kalyan vilas randve marathi news
भाजपचे कल्याण जिल्हा सचिव विलास रंदवे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत
Deputy Chief Minister Devendra Fadnavis claim regarding the unexpected result in the Lok Sabha
लोकसभेतील अनपेक्षित निकालानंतर नाराजीची तीव्रता आता कमी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Marathwada bjp amit shah marathi news
मराठवाड्यात भाजपने कंबर कसली, अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक
Tirupati Laddu Controversy Pawan Kalyan
Tirupati Laddu Row: ‘माझी फसवणूक झाल्यासारखं वाटतं’, उपमुख्यमंत्री पवन कल्याण ११ दिवसांचा उपवास करणार
Eknath Shinde Buldhana, Congress leaders Buldhana,
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात घुसण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न; काळे झेंडे दाखविले

कोरपना तालुक्यातील आवारपूर येथे दोन दिवसात चार जणांचा मृत्यू झाला. २९ मे रोजी अहिम शेख (३०) व नानाजी चहारे (९०) या दोघांचा मृत्यु झाला, तर २८ मे रोजी महादेव वासेकर, अंबादास धोटे, चंद्रभागा सोनटक्के व संजय मांदाळे या चौघांचा मृत्यू झाला. कोरपना तालुक्यातील हिरापूर येथे सुंदराबाई कोडापे (७०) व गोंडीनबाई आत्राम (७५) या दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला. गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा येथे दोघांचा व धानापूर येथे एकाचा मृत्यू उष्माघाताने झाला. या मृत्यूंची नोंद जिल्हा प्रशासनाने अथवा आरोग्य विभागाने घेतली नाही, असा आरोप धोटे यांनी केला आहे.

आणखी वाचा-७२ वर्षात फक्त एकानेच साधली नागपूर लोकसभेत हॅट्रिक, कोण आहेत ते?

यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधव चिंचोले यांना विचारणा केली असता, आरोग्य विभागाच्या ‘पोर्टल’वर उष्माघाताची नोंद नाही. मात्र काही दिवसांपूर्वी भद्रावती, सावली व नागभीड येथे झालेल्या मृत्यूंमध्ये उष्माघाताचा संशय व्यक्त होत आहे, असे त्यांनी सांगितले.

सिंदेवाही येथे अरुण रंदये (४९) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. वरोरा येथील कुणाल उर्फ संकेत मडावी या तरुणाने जेवणानंतर पाणी पिले. त्यानंतर लगेच प्रकृती खालावून कुणालचा मृत्यू झाला. हा प्रकारही उष्माघाताचाच असल्याची चर्चा आहे. गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथील वयोवृद्धाचा तर धाबा येथील रवी बोन्डकू चौधरी व शांताबाई उसन्ना संदेलवार (७०) या दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे.