नागपूर: तुम्ही जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी फार महत्त्वाची राहणार आहे. एमपीएससीने जून २०२२ मध्ये राज्यसेवा परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २०२३ पासून होणार होती. मात्र एका वर्षातच परीक्षेत इतका मोठा बदल होत असल्याने जुन्या परीक्षा पद्धतीने अभ्यास करणाऱ्यांचे नुकसान होईल, नवीन परीक्षा पद्धती लागू करताना आयोगाने किमान तीन वर्षांचा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या बदलामुळे त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार होती आणि त्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नव्हता. त्यामुळे परीक्षेतील नवा बदल हा २०२५ पासून लागू करावा, या मागणीसाठी राज्यातील प्रमुख शहरांत विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. राजकीय पक्षांनीही या आंदोलनांत उडी घेतली होती. राज्य शासनाने मध्यस्थी केली व ‘एमपीएससी’ने राज्यसेवा परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, परीक्षेची नवीन पद्धत, नवीन अभ्यासक्रम नेमका कधी लागू होणार?, राज्यसेवा २०२४च्या विद्यार्थ्यांना जागा वाढ मिळणार का? यासंदर्भात एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा