लोकसत्ता टीम

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेमध्ये एका उमेदवाराने स्पाय कॅमेऱ्याचा वापर करुन सेट ‘बी’ची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका फोडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यासह त्याला या कामात मदत करणाऱ्या तिघांविरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
Mahakumbh :
Mahakumbh : महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची एक घटना घडली की दोन? सखोल चौकशी करण्याची पोलिसांची माहिती
NITI Aayog diagnoses deterioration in maharashtra state financial health
राज्याचे ‘वित्तीय आरोग्य’ खालावल्याचे निती आयोगाकडून निदान
Testing of water supplied through tankers wells borewells due to GBS disease pune
पिंपरी: ‘जीबीएस’चा धोका वाढला! टँकर, विहिरी, बोअरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी
businessman attacked with sharp weapon over minor dispute near kasba ganapati temple
किरकोळ वादातून व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार; कसबा गणपती मंदिराजवळील घटना
Changes in the format of the NEET question paper
‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल

एमपीएससीमार्फत महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील विविध अराजपत्रित गट ‘ब’ व गट‘क’ संवर्गातील पदभरतीकरीता रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा नवी मुंबईसह महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. परीक्षेला बसलेला जालना येथील उमेदवार आकाश भाऊसिंग घुनावत (वय २७) याने हडपसर पुणे येथील जेएसपीएम जयवंतराव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेट ‘बी’ची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्पाय कॅमेऱ्याद्वारे जीवन नायमाने या व्यक्तीला पाठविली होती. त्यानंतर जीवन नायमाने याने प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शंकर जारवाल याच्या मोबाईलवर पाठवली. मात्र त्यावेळी हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नव्हता.

आणखी वाचा-‘एमपीएससी’चा कारभार सुधरेना, आता तांत्रिक अडचणींमुळे शेकडो उमेदवार अर्जास मुकणार!

पेपर फोडणाऱ्या टोळीने आता आयोगाचाही पेपर फोडला आहे. या टोळ्यांच्या सदस्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत पण पेपर फोडल्यानंतर कठोर शिक्षा होत नसल्याने त्यांचे फावत आहे. आयोग असो किंवा सरळसेवा असेच पेपर फुटत राहिले तर प्रामाणिक उमेदवारांना नोकऱ्याच लागणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पेपरफुटीवर जन्मठेपेची शिक्षा असणारा कठोर कायदा व्हायला हवा. -स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Story img Loader