नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांमागे या मार्गावर थांबे नसणे हेसुद्धा एक कारण आहे. त्यामुळे ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात वेढकाढूपणा सुरू आहे. एका खासगी कंपनीने या सुविधा पुरवठय़ाबाबत दिलेला प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरुवातीला स्वीकारून नंतर तो रद्द केल्याने या कामाला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या समृद्धीत भर घालणारा महामार्ग म्हणून ‘समृद्धी’ची प्रसिद्धी केली जात असली तरी लोकार्पणापासूनच या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. महामार्गावर एकही थांबा नसणे, त्यामुळे वाहने सुसाट वेगाने धावणे, टायर फुटणे यासह तत्सम बाबींमुळे अपघात होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच रस्त्यालगत थांबे, उपाहारगृहे आणि अन्य सुविधांची उभारणी तातडीने करावी, अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. मात्र, अद्याप ही प्रक्रिया निविदा काढण्याच्या पलीकडे गेलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा