नागपूर : उकाड्यामुळे बेजार झालेल्या नागपूरकरांना पावसामुळे दिलासा मिळाला खरा, पण कच्चे रस्ते चिखलाने माखले, तेथील खड्ड्यात पाणी साचले. तेथून भरधाव जाणारे दुचाकीस्वार इतरांच्या अंगावर चिखल, पाणी उडवत जात असल्याने अनेकांचे कपडे खराब होत आहे. शुक्रवारी नागपुरातील कळमन्या मार्गावरील रस्त्यावर असा प्रसंग एका दाम्पत्यावर गुदरला.

गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होता. नेहमीप्रमाणे रस्त्यावर पाणी साचले, दुपारपर्यंत ते ओसरलेही. पण रस्त्याचे, उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जे कच्चे रस्ते तयार केले तिथली स्थिती गंभीर आहे. पावसाने ते पूर्णपणे चिखलाने माखले आहे. खड्ड्यात पाणी साचले आहे.

Nagpur to Sikandarbad Vande Bharat Express coaches to be reduced
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला अल्प प्रतिसाद,डबे कमी होणार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Sand Policy, Sand , Sand Auction, Scarcity ,
नागपूर : फसलेल्या वाळू धोरणाचे चटके, परराज्यातील वाळूचा पर्याय
Bus Passenger Thrashes Conductor After argument over change money
नागपूर : सुट्या पैशांवरून बाचाबाची; एसटी बसच्या वाहकाला मारहाण…
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
Loksatta shaharbat Vasai suffers from heavy dust pollution
शहरबात: धूळ प्रदूषणाने वसईची घुसमट …
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण

हेही वाचा – महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पाऊस; काय आहे हवामान खात्याचा अंदाज

शांतीनगरमधील रामसुमेर कुत्ते वाले बाबा आश्रम- कावरापेठ रेल्वे फाटक ते लेकर कलमना रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाण पुलाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. पुलाच्या बाजूने जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला. तेथील खड्ड्यात पाणी साचले व रस्त्यावर चिखल साचला. शुक्रवारी दुपारी रामेश्वरीहून कामठीला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एक दाम्पत्य दुचाकीने निघाले. कळमन्याजवळ पोहोचताच चिखलामुळे त्यांची दुचाकी घसरली व दोघेही पती-पत्नी पडले. त्याच वेळी दुसरी दुचाकी त्यांच्या अंगावर चिखल उडवत गेली. त्यामुळे त्यांचे कपडे व वाहन पूर्णपणे खराब झाले.

हेही वाचा – नागपूर: आज रात्रीपासूनच ‘या’ ठिकाणी पडणार पाऊस

असाच प्रसंग याच ठिकाणी अनेक पादचाऱ्यांवरही गुदरला. कंत्राटदाराच्या नावे बोटे मोडून ते पुढच्या प्रवासाला गेले. शहरातील इतरही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून वाहतूक कच्च्या रस्त्यावरून वळवली आहे. तेथेही हीच स्थिती आहे.

Story img Loader