अमरावती : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्रिपल इंजिन सरकार हे खुनी सरकार आहे, असा आरोप राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सध्‍याच्‍या सरकारचा कारभार आपण सर्व जण पाहत आहात. ज्‍या पद्धतीने या लोकांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले, त्‍यामुळे लोकांच्‍या मनात या सरकारविषयी रोष आहे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

अमरावतीत प्रसार माध्‍यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या, आयकर, सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून कोविड काळात चांगली कामगिरी करणारे उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्‍याचे पाप भाजपने केले आहे. साम, दाम, दंड, भेद हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्‍द अजूनही मला आठवतात. काहीही करा, पण जिंका, असे ते म्‍हणतात.

What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Dont just see illegal banner display also report it Ambernath Municipality appeals to citizens
बेकायदा बॅनरबाजी फक्त बघू नका, तक्रारही करा; अंबरनाथ नगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

हेही वाचा >>> पक्षाने संधी दिल्यास वर्ध्यातून लोकसभा लढणार-सुप्रिया सुळे

एकनाथ शिंदे यांच्‍या सरकारच्‍या काळात कुठली चांगली कामे झालीत, हे आपल्‍याला कुणीतरी सांगा. नांदेडच्‍या शासकीय रुग्‍णालयातील मृत्‍यूंना पूर्णपणे महाराष्‍ट्र सरकार जबाबदार आहे. मुख्‍यमंत्र्यांनी आरोग्‍य मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. कारण २५ हून अधिक लोक दगावले आहेत आणि त्‍यात १२ लहान मुले आहेत. या मुलांच्‍या आईला काय उत्‍तर देणार तुम्‍ही. ठाण्‍यात देखील असेच प्रकरण उघडकीस आले होते. आता नांदेडमध्‍ये मृत्‍यू झाले आहेत. इतर ठिकाणाहून देखील अशा बातम्‍या येताहेत, हे पूर्णपणे सरकारचे अपयश आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. या सरकारच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल झाला पाहिजे, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

Story img Loader