नागपूर : वाघधरा येथे तीन मित्रांची निघृण हत्या करणा-या आरोपीला नागपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राजू बिरहा याने पान टपरीच्या जागेवरून तीन मित्रांचा सत्तुरने खून केला होता. सत्र न्यायालयाने बिरहा याला डिसेंबर २०२२ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा >>> ‘सिल्वर लेक फार्म रिसॉर्ट’ बनला ‘सेक्स रॅकेट’चा अड्डा! १३ बारबालांना घेतले होते पोलिसांनी ताब्यात

Mumbai High Court
उपनगरीय लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : दोषसिद्ध आरोपींच्या अपिलावरील निर्णय उच्च न्यायालयाकडून राखीव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
case filed against man who help to escape accused in kalyan district court
कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपीला पळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इसमावर गुन्हा
high court granted bail to six accused in Govind Pansares murder case after six years in custody
पानसरे हत्या प्रकरण : सहा आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन
pil filed in High Court demanding ED inquiry into Valmik Karad accused in Santosh Deshmukhs murder
वाल्मिक कराडच्या आर्थिक व्यवहारांच्या ईडी चौकशीचे आदेश द्या, जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मागणी
Motor Accident Claims Tribunal , vacancies ,
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील रिक्त पदे कधी भरणार ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
beggar murder news in Pune,update in marathi
पुण्यातील लष्कर भागात भिक्षेकऱ्याची मारहाण करुन हत्या
Pune Municipal Corporation news in marathi
प्रशासन राज आणि चुकलेला ‘अंदाज’

फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने शिक्षेवर शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्यावतीने उच्च न्यायालयात हे प्रकरण सादर करण्यात आले . जुलै महिन्यात न्या.विनय जोशी आणि न्या.वाल्मिकी मेनेझेस यांच्या समक्ष प्रकरणावर सुनावणी झाली आणि न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. १२ ऑक्टोबरला न्यायालयाने बिरहाच्या वागणुकीबाबत कारागृह प्रशासनाकडे विचारणा केली होती. कारागृ़ह प्रशासनाने बिरहाची वर्तवणूक साधारण असल्याचे न्यायालयाला सांगितले. कारागृहात बिरहाविरोधात शिस्तभंगाची कोणतीही तक्रार नसल्याचे कारागृह प्रशासनाने अहवालात सांगितले आहे. शासनाच्यावतीने ॲड.संजय डोईफोडे, आरोपीच्यावतीने ॲड.अनिल मार्डीकर आणि ॲड.सुमित जोशी यांनी बाजू मांडली.

Story img Loader