नागपूर : वाघधरा येथे तीन मित्रांची निघृण हत्या करणा-या आरोपीला नागपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राजू बिरहा याने पान टपरीच्या जागेवरून तीन मित्रांचा सत्तुरने खून केला होता. सत्र न्यायालयाने बिरहा याला डिसेंबर २०२२ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा >>> ‘सिल्वर लेक फार्म रिसॉर्ट’ बनला ‘सेक्स रॅकेट’चा अड्डा! १३ बारबालांना घेतले होते पोलिसांनी ताब्यात

Education department given detailed instructions regarding contract teacher selection process
कंत्राटी शिक्षकांची निवड प्रक्रिया कशी होणार? शिक्षण आयुक्तालयाने दिल्या सूचना…
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
no decision from maha government on mahajyoti withdraw from uniform policy process
‘समान धोरण’मुळे लाखो विद्यार्थी वंचित; ‘महाज्योती’ बाहेर पडल्यानंतर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
bombay high court denies foreign travel permission to indrani mukherjea
इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीस उच्च न्यायालयाचा नकार; सीबीआयची विरोध करणारी याचिका योग्य ठरवली
Mumbai University General Assembly Election result today Mumbai
अधिसभा निवडणुकीचा निकाल आज; याचिकाकर्त्यांची स्थगितीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
Supreme Court Questions on Baijuj Case Verdict print eco news
बैजूज प्रकरणाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचे प्रश्न
ram jhula hit and run case
“तांत्रिक कारणांमुळे न्याय पराभूत होता कामा नये”, रितू मालू प्रकरणी सत्र न्यायालय म्हणाले…
Even the High Court could not save the students academic year standoffish stance of the CET Cell
उच्च न्यायालयही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाचवू शकले नाही, सीईटी सेलची आडमूठी भूमिका…

फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने शिक्षेवर शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्यावतीने उच्च न्यायालयात हे प्रकरण सादर करण्यात आले . जुलै महिन्यात न्या.विनय जोशी आणि न्या.वाल्मिकी मेनेझेस यांच्या समक्ष प्रकरणावर सुनावणी झाली आणि न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. १२ ऑक्टोबरला न्यायालयाने बिरहाच्या वागणुकीबाबत कारागृह प्रशासनाकडे विचारणा केली होती. कारागृ़ह प्रशासनाने बिरहाची वर्तवणूक साधारण असल्याचे न्यायालयाला सांगितले. कारागृहात बिरहाविरोधात शिस्तभंगाची कोणतीही तक्रार नसल्याचे कारागृह प्रशासनाने अहवालात सांगितले आहे. शासनाच्यावतीने ॲड.संजय डोईफोडे, आरोपीच्यावतीने ॲड.अनिल मार्डीकर आणि ॲड.सुमित जोशी यांनी बाजू मांडली.