लोकसत्ता टीम

यवतमाळ : शहरातील विवेकानंद विद्यालय व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची मोक्याची जागा तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांच्या आदेशाने बळकावण्याचा प्रयत्न भू-माफियांनी केला होता. त्यात त्यांना भूमिअभिलेख विभागाकडूनही मदत मिळाली होती. मात्र ही जागा हडपण्याच्या प्रयत्नात असलेल्या भू-माफियांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलीच चपराक दिली आहे.

Dharavi Kumbharwada rehabilitation
धारावी कुंभारवाड्याचे मुलुंड कचराभूमीच्या जागेवर पुनर्वसन?; जागा दाखविण्यासाठी नेल्याने रहिवासी संतप्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mlas urged prioritizing crime prevention and sand smuggling before planning expenditure in committee meeting
“यवतमाळात गुन्हेगारी, वाळू तस्करांची दादागिरी वाढली; आधी ते रोखण्याचे ‘नियोजन’ करा, मग…” लोकप्रतिनिधी आक्रमक
Vijay Ghaywat, jail, Nagpur, loksatta news,
नागपूर : विकृत विजय घायवटची पुन्हा कारागृहात रवानगी
thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार
Two quintals of ganja seized in Santnagari Shegaon buldhan newे
बुलढाणा : संतनगरी शेगावात दोन क्विंटल गांजा जप्त, एक आरोपी जेरबंद
Widow practice, villages , Kolhapur,
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

विशुद्ध विद्यालय यवतमाळद्वारा संचालित विवेकानंद विद्यालय व राणी लक्ष्मीबाई विद्यालय यांची शिवाजीनगर येथे तीन एकर (१.२१ हेक्टर) जागा आहे. १९५० सालापासून ही जागा संस्थेच्या ताब्यात आहे. त्याची सर्व कागदपत्रे योग्य असतानाही स्थानिक भू-माफियांनी दक्षिणेकडील काही जागेचा वाद उत्पन्न केला. भूमिअभिलेख कार्यालयाशी संधान साधून २१ डिसेंबर २०१९ रोजी मोजणीत खोटे नकाशे सादर करून जागा बळकावली. या विरुद्ध संस्थेने तक्रार केल्यानंतर चुकीची मोजणी रद्द झाली. त्या जागेची १७ जुलै २०२० रोजी फेरमोजणी होऊन हद्द कायम करण्यात आली व जागा संस्थेच्या ताब्यात देण्यात आली. मात्र यानंतरही २० जून २०२२ मध्ये तत्कालीन महसूल राज्यमंत्री यांच्याकडून चुकीचा आदेश घेऊन भू-माफियांनी पुन्हा त्या जागेचा ताबा घेतला.

आणखी वाचा-राज्यात पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्याची शक्यता

संस्थेने या आदेशावर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयात भू- माफियांनी सादर केलेले खोटे नकाशे निदर्शनास आले व न्यायालयाने महसूल राज्यमंत्री यांचा आदेश रद्द करून २५ सप्टेंबर रोजी संस्थेची तीन एकर जागा भू-माफियांकडून काढून संस्थेच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयाने शहरातील भू- माफियांना चांगलीच चपराक बसली आहे. या दोन्ही संस्था संघ परिवारातील आहेत. या संस्थांवर भू माफियांची वक्रदृष्टी पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Story img Loader