नागपूर : राज्यासह देशभरात करोनाचा प्रभाव ओसरला आहे. परंतु आजही करोनापश्चात काही रुग्णांमध्ये थकवा, अशक्तपणा, झोपेच्या समस्यांसह इतरही काही त्रास आढळत आहे, अशी माहिती महाराष्ट्रातील कोविड टास्क फोर्सचे माजी सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली.

नागपुरातील हाॅटेल सेंटर पाॅईंट येथे शनिवारी अतिदक्षता विभाग तज्ज्ञाची आंतराष्ट्रीय परिषद होती. त्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. पंडित पुढे म्हणाले, भारतात करोनाची साथ गंभीर होती. परंतु सरकारचे झटपट नियोजन आणि समाजाच्या सामुहिक प्रयत्नातून करोनावर नियंत्रण मिळवले. आजही काही गंभीर करोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये थकवा, अशक्तपणा, झोपेच्या व्याधीसह इतरही त्रास आढळत आहे.

Riverside beautification project development works Modern knowledge and technology
नद्यांवर जुनाट कल्पनांचे तटबंध!
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
pediatricians observation in diseases in children
धक्कादायक… विविध आजारांच्या लक्षणांमध्ये बदल; बालरोगतज्ज्ञ म्हणतात, “करोनापश्चात…”
astronomers research regarding future earth and how it will be after 800 million
विश्लेषण : ‘भविष्यातील पृथ्वी’बाबतचे खगोलतज्ज्ञांचे संशोधन काय? आठशे कोटी वर्षांनंतर पृथ्वी कशी असेल?
reason behind celebration of wildlife week
विश्लेषण : वन्यजीव सप्ताह हा आता इव्हेंट झाला आहे का?
Bhosari MIDC Garbage piles
भोसरी एमआयडीसीत कचऱ्याचे साम्राज्य
healthy liver: 1-3 of 10 Indians have liver disease, says health ministry; here’s how to ensure you’re safe
Liver health: दहा पैकी तीन लोकांमध्ये यकृताची समस्या; कशी काळजी घ्याल स्वत:ची? जाणून घ्या
Shadashtak yoga will create Saturn-Sun
शनी-सूर्य निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार संकटांचं वादळ होणार आर्थिक नुकसान

हे ही वाचा…दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दराने सर्व विक्रम मोडले; हे आहेत आजचे दर…

पूर्वी गंभीर साथीचे आजार झालेल्या रुग्णांमध्येही अनेक वर्षानंतर अशक्तपणा, थकवासह इतरही काही त्रास राहायचा. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. आता प्रत्येक रुग्णाच्या त्रासाला गांभिर्याने बघितले जाते. करोनानंतर आताच्या काळात अतिदक्षता विभाग, जिवनरक्षण प्रणालीसह इतरही अत्यवस्थ रुग्णांशी संबंधित गोष्टीला सर्वसामान्य नागरिकही ओळखायला लागले आहे. त्यामुळे आजार झालेला व्यक्त जास्त दिवस अंगावर त्रास काढत नाही. हे रुग्ण लगेच शासकीय वा खासगी डॉक्टरांकडे उपचाराला येतो. त्यामुळे रुग्णावर वेळीच उपचार होत असल्याने त्यामधील गुंतागुंत वाढत नाही. सरकार नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणे चांगली गोष्ट असून त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय यंत्रणा सक्षम होण्यास मदत होणार असल्याचेही डॉ. पंडित यांनी सांगितले.

करोनानंतरही रोगप्रतिकारक शक्ती चांगली

करोनामध्ये विविध औषधांतून रुग्णांवर स्टेराॅईडचा वापर झाला. परंतु ते बहुतांश रुग्णांवर हा वापर गरजेचाही होता. करोनापश्चात आता विविध उपचाराला येणाऱ्या रुग्णांवर उपार करताना आताही या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असून ते सर्वच औषधांना चांगला प्रतिसाद देत असल्याचा अनुभव येत असल्याचेही डॉ. पंडित म्हणाले.

हे ही वाचा…”राणा दाम्‍पत्‍यासाठी पती-पत्‍नी एकत्रिकरण योजना राबविणार”, भाजप नेत्याची टीका

‘इकमो’सह नवीन तंत्रज्ञान रुग्णांसाठी फायद्याचे

हल्ली एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (इकमो)सह इतरही नवीन तंत्रज्ञान रुग्णांसाठी फायद्याचे ठरत आहे. इकमो हा एक प्रकारचा कृत्रिम जीवन आधार आहे. तो रुग्णाचे फुफ्फुस आणि हृदय योग्यरित्या कार्य करत नसल्यास संबंधिताच्या शरीरातून सतत रक्त पंप करते आणि नंतर ऑक्सिजन जोडणाऱ्या आणि कार्बन डायऑक्साइड काढून टाकणाऱ्या उपकरणांद्वारे पाठवते. हृदयाला आणि फुफ्फुसांना विश्रांती देणे आणि श्वसन संक्रमण, हृदयविकाराचा झटका किंवा आघातातून बरे करण्यासाठी इकमो फायद्याचे आहे.