नागपूर : प्रसिद्ध व भोसलेकालीन टेकडी गणपती मंदिराला अखेर राज्य शासनाने ‘अ’ दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित केले आहे. शासनाने तसा निर्णयही सोमवारी काढला. मंदिराचे बांधकाम अठराव्या शतकात राजे भोसले यांच्या कार्यकाळात झाल्याचे सांगितले जाते.

भोसले आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी हे गणपतीचे मंदिर आहे. सुरुवातीला मंदिर छोटे होते. आता त्याचा विकास झाला आहे. येथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह इतरही मान्यवरांनी या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आहे. येथे भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे या मंदिराला ‘अ’ दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती. सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे हे २०१३ पासून या मागणीसाठी पाठपुरावा करीत होते. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मंदिराला ‘अ’ दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित करावे म्हणून अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. पण तांत्रिक अडचणीमुळे अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. दरम्यान, २०२३ मध्ये फडणवीस यांनी पुन्हा यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या.

kalyan forest officials arrested man from runde village for hunting peacock on saturday
कल्याणजवळील रूंदे गावात मोराची शिकार करणाऱ्या इसमास अटक
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
banana cultivation Ujani
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात केळीच्या लागवडीत मोठी वाढ
sambar marathi news
सातारा: पाचगणीत आढळले दुर्मीळ पांढरे सांबर
municipality is redirecting overflowing Vihar Lake water to Bhandup purification center
विहार तलावाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात, विहार उदंचन केंद्राचे बांधकाम करण्याचा पालिकेचा निर्णय
cleaning campaign of Nag Tsoli and Pohra rivers in city will start from February 7
नागपुरातील तीन नद्यांची सफाई एकाच वेळी , सात पोकलेन आणि बरेच काही …
Exhibition of Shivashastra and Shaurya Saga at Central Museum in Nagpur
शिवरायांची ‘वाघनखे’ बघायची असतील तर नागपूरला चला
historic tiger claws of Chhatrapati Shivaji Maharaj left the Satara museum for Nagpur on Friday 31st
ऐतिहासिक वाघनखे नागपूरला रवाना

हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

१८ ऑगस्टला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठक घेतली होती व मंदिराला ‘अ’ दर्जा द्यावा, असा ठराव पर्यटन मंत्रालयाकडे पाठवला. अखेर ११ मार्च २०२४ ला पर्यटन मंत्रालयाने ‘अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित केले. त्यामुळे या मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Story img Loader