नागपूर : पूर्व नागपुरातील कळमना ते पारडी दरम्यानचा निर्माणाधीन उड्डाण पूल कोळसण्याची कारणे शोधण्यात दोन तज्ज्ञ समित्यांना अपयश आले असून पूल नेमका का कोसळला? याचे गुढ कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> सैन्यदलात अग्नीवीरांच्या भरतीचा कंत्राटदार कोण? जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारला बोचरा सवाल

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) या उड्डाण पुलाचे बांधकाम करीत आहे. हा निर्माणधीन पूल १९ ऑक्टोबर २०२१ कोसळला होता. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही, परंतु बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ही बाब एनएचआयने गंभीर्याने घेऊन प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्यानंतर आयआयटी मुंबईच्या तीन तज्ज्ञांच्या समितीकडून पूल कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समिती नेमली होती. समितीने केलेल्या चौकशीत बांधकामाची गुणवत्ता योग्य असल्याचे आढळून आले.

हेही वाचा >>> ‘उद्धव ठाकरे’ नावाची किंमत ते विधानपरिषद निवडणुकीची चिंता… शिवसेना वर्धापनदिनी मुख्यमंत्र्यांची चौफेर टोलेबाजी! 

त्यानंतर एनएचएआयने आणखी एक समिती स्थापन केली. या समितीमध्येदेखील तीन तज्ज्ञ होते. या समितीला देखील पूल कोसळण्याची कारणे शोधता आले नाहीत, असे एनएचएआयचे विभागीय अधिकारी व मुख्य महाव्यवस्थापक राजीव अग्रवाल यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१४ मध्ये या पुलाचे भूमिपूजन झाले होते. तीन वर्षात पूल पूर्ण होणे अपेक्षित होते. विलंबामुळे या प्रकल्पाची किंमत वाढली. शिवाय आणखी सहा महिने पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास लागणार आहे.

हेही वाचा >>> “मी जर चिंता करत बसलो तर…”, उद्धव ठाकरेंचा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना संदेश!

दरम्यान, पुलाच्या बांधकामावर ४४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु आता ४८ कोटी रुपये अतिरिक्त खर्च होतील. या पुलाचे काम २०२२ च्या अखेर पूर्ण होईल, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur to committee of experts fail to find cause of flyover fall of kalaman prd
Show comments