नागपूर : नागपूरच्या एका दाम्पत्यासह ११ लोकांनी नागपूर ते लंडन असा १६ हजार किलोमीटरचा प्रवास चक्क कारने केला. ६५ दिवसांच्या या प्रवासात रस्त्यातील अनेक आव्हानांना सामोरे जात २१ देशांच्या सीमा यांनी ओलांडत नागपूरकरांनी ही कामगिरी केली आहे.

नागपूरच्या दिनेश राठी यांनी त्यांच्या पत्नीसह ही कामगिरी केली आहे. यात त्यांना इतर नऊ लोकांनीही सहप्रवासी म्हणून साथ दिली. रस्तावरून जगाचे भ्रमण करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्यावर दिनेश राठी यांनी आनंद व्यक्त केला. १७ एप्रिल रोजी दिनेश यांनी त्यांच्या साथीदारासह प्रवासाची सुरुवात केली. यादरम्यान तिबेटमधील माउंट एवरेस्ट ते मध्य आशियातील पामीर पर्वत शृंखला ते युरोपमधील आल्प पर्वत रांग याचा अनुभव त्यांनी घेतला.

Entry of wild elephants into Gadchiroli border Gadchiroli
रानटी हत्तींचा गडचिरोलीच्या सीमेत प्रवेश, शहरापासून चार किमी अंतरावर वाहतूक रोखली..
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
mumbai roads
Mumbai Traffic Issue: मुंबईच्या वाहतूक समस्येवरचा उपाय; MMRDA नं मंजूर केले ५८ हजार कोटींचे प्रकल्प; पाच वर्षांत होणार मनस्तापातून सुटका?
Kalwa-Airoli Project, Mumbai, Kalwa-Airoli,
मुंबई : साडेसात वर्षांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे केवळ ४६ टक्के काम पूर्ण
cm eknath shinde
“शक्तिपीठाला विरोध केवळ नांदेड, कोल्हापूरकरांचा”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
whatsapp special campaign focused on small businesses
छोट्या व्यवसायांवर केंद्रित ‘व्हॉट्सॲप’ची विशेष मोहीम
ST diesel buses will start in October mumbai news
ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बस दाखल होणार
4000 crpf jawan deployed in chhattisgarh
छत्तीसगडमध्ये चार हजार ‘सीआरपीएफ’ जवान तैनात! नक्षलविरोधी मोहिमेसाठी झारखंड, बिहारमधील तुकड्या माघारी

सुमारे साडेपाच हजार मीटरच्या उंचीवरील रस्त्यातून त्यांनी आपल्या स्वप्नाना मार्ग काढत प्रवास केला. प्रवासातील अनुभव सांगताना दिनेश यांनी सांगितले की, प्रत्येक देशाची सीमा ओलांडताना वेगवेगळे आव्हान पुढे आले. चीनमधून प्रवास करताना अतिशय अडचणींना सामोरे गेलो. भारतातून चीनमध्ये थेट प्रवेश करता येत नाही. यासाठी विशेष परवानगी मिळविणे गरजेचे असते. ही परवानगी मिळविणेही वेगळेच आव्हान होते. प्रवासातून अनेक देशातील सांस्कृतिक वैभव जवळून बघायची संधी मिळाली. यामुळे जागतिक दृष्टिकोनात मोठा फरक झाला. जसा आपण जगाचा विचार करतो, तसे जग नाही आहे, याची प्रचिती प्रवासादरम्यान आली. अनेक देशातील सुरक्षारक्षकांना फार कडक मानले जाते. मात्र आम्हाला प्रत्येक देशातील सुरक्षा रक्षकांनी मोठ्या मनाने मदत केली. प्रवासादरम्यान त्या त्या देशातील नागरिकांनीही जिव्हाळ्याने स्वागत केले. भाषेतील फरक असतानाही त्यांनी आम्हाला त्यांच्यात सामावून घेतले. प्रवासाची सुरुवात झाली तेव्हा २३ लोक एकत्र होते, मात्र लंडनपर्यंतचा प्रवास केवळ ११ लोक यशस्वीपणे करू शकले.

हेही वाचा – मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातील प्रवासी रेल्वे स्थानकातून घरी

हेही वाचा – ठाणे, पालघरमध्ये मुसळधार; कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक ठप्प, प्रवाशांचे अतोनात हाल

दररोज ५०० किमी प्रवास

प्रवासात अनेक पर्वतरांगा, कठीण रस्ते होते. तरीदेखील दररोज ५०० किलोमीटर प्रवास करण्याचा निश्चय केला होता. सामान्य ठिकाणी ७०० किलोमीटर प्रतिदिन प्रवास केला. गोठवणारी थंडी ते ऑक्सिजनची कमतरता असलेले पर्वत असे विविध अनुभव प्रवासादरम्यान आले. प्रवासादरम्यान खाण्यासाठी आणि राहण्यासाठी अतिशय विचारपूर्वक योजना आखली होती. या प्रवासात प्रति व्यक्ती २५ लाख रुपये इतका खर्च आला आहे, अशी माहिती दिनेश राठी यांनी दिली. हा केवळ लंडन गाठण्याचा प्रवास नव्हता तर शारीरिक आणि सांस्कृतिक सीमेपलिकडे जीवन जगण्याचा एक प्रयत्न होता, असे दिनेश राठी यांनी आवर्जून सांगितले.