लोकसत्ता टीम

नागपूर: ऐतिहासिक शहरांमध्ये गणना होत असलेल्या नागपूर शहरात अनेक प्राचीन व पुरातन वास्तू आहेत. आजही त्या जुन्याच नावाने ओळखल्या जातात. नागपूरचे इतवारी रेल्वे स्थानक त्यापैकीच एक. त्याचा नामविस्तार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आता हे रेल्वे स्थानक नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक या नवीन नावाने ओळखले जाईल. नामविस्ताराची अधिसूचना २३ जून रोजी काढण्यात आली.

Four special trains will run from Nagpur for Kumbh Mela
नागपूरहून कुंभमेळासाठी चार विशेष गाड्या धावणार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
historic tiger claws of Chhatrapati Shivaji Maharaj left the Satara museum for Nagpur on Friday 31st
ऐतिहासिक वाघनखे नागपूरला रवाना
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
Kasheli village in Rajapur is the first solar village in the state
राजापुरातील कशेळी गाव राज्यातील पहिले ‘सोलर गाव’
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!

नागपूरमध्ये तीन रेल्वे स्थानके आहेत. एक मुख्य रेल्वे स्थानक,दसरे अजनी आणि तिसरे इतवारी. दिल्लीकडून येणाऱ्या गाड्या मुख्य रेल्वे स्थानकावर फलाट उपलब्ध नसल्याने थांबत असत. आता येथे काही गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात आला तर काही पॅसेंजर गाड्या येथून अलिकडच्या काळात सोडण्यात येऊ लागल्या. ब्रिटिशांच्या काळात या भागात साप्ताहिक बाजार भरत होता. या भागाचे नाव इतवारी असलेल्याने तेच नाव स्थानकाला देण्यात आले. मात्र या भागांतील लोकांनी सुभाषचंद्र बोस यांचे नाव स्थानकाला देण्याची मागणी केली. महापालिकेने तसा ठराव २०२२ मध्ये केला.राज्यसरकारने त्याला मान्यता दिली व केंद्राकडे पाठवला. केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली.या भागाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी यासाठी पाठपुरावा केला.

Story img Loader