गोंदिया : सुप्रीम कोर्टाने प्रतोद म्हणून आमदार सुनील प्रभू यांना मान्यता दिली आहे. प्रभू हे उद्धव ठाकरे गटाचे आहेत. त्यांनी दिलेल्या नोटीसचे पालन न केल्यास हा मार्ग अपात्रतेकडे जातो. भारतीय संविधानातील शेड्यूल १० मध्ये ही संपूर्ण प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमुळेच शिंदे गटाचे ४० आमदार अपात्र ठरणारच, अशी भविष्यवाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पोळानिमित्ताने आपल्या सुकडी गावात आले असता ते माध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणाचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाही तर देवेंद्र फडणवीस यांचे पाप आहे. भाजपाला सत्तेत आणण्यासाठी त्यांनी २०१४ मध्ये मराठा, धनगर, हलबा यांना आरक्षणाचे खोटे आश्वासन दिले. आता केंद्रात आणि राज्यात त्यांचेच सरकार आहे, मग त्यांनी या सर्व समाजाला आरक्षण द्यावे, असे पटोले म्हणाले.

Eknath Shinde on Sanjay Raut
“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
women given special discounts by builders in thane
ठाण्यात बिल्डरांकडूनही लाडक्या बहिणींना विशेष सवलत; यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

हेही वाचा – भंडारा: अंघोळीकरिता गेला अन् नदीत बुडाला; शोध सुरू

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस माझ्यामुळेच मुख्यमंत्री…!”, नाथाभाऊ स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्यांची सुडाची वृत्ती…”

विदर्भात चांगला पाऊस पडत आहे, पण महाराष्ट्रातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, प. महाराष्ट्र या अनेक ठिकाणी पाऊसच नाही. या भागांसाठी उपाययोजना करण्यात सरकार मागे पडते आहे. सरकारची भूमिका शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे, शेतीचा खर्च वाढविणे, शेतमालाला भाव न मिळू देणे, अन्नदात्याला आत्महत्या करण्यासाठी प्रेरित करणे, ही जी पापवृती सत्तेमध्ये बसून भाजपा करते आहे, ती चुकीची आहे, असेही पटोले यांनी सांगितले.

Story img Loader