भंडारा : काँग्रेसच्या संवाद यात्रेच्या समारोपाप्रसंगी भंडाऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पार्टीवर घणाघाती आरोप करत टिकास्त्र सोडले आहे.

नाना पटोले म्हणाले की, निवडणुका येताच किंवा त्यापूर्वी भाजपा काही ना काही प्रकरण उकरवून – घडवून आणत असतो. निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये ज्याप्रमाणे हिंदू आणि मुसलमानामध्ये दंगली घडवून आणल्यात, गोध्राकांड घडविण्यात आले, पुलवामा हल्ला करविण्यात आला आता त्याच पार्श्वभूमीवर आता निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराचा वापर होऊ शकतो. त्यामुळे राममंदिराला आता धोका होऊ शकतो, असे स्फोटक विधान नाना पटोले यांनी केले आहे. म्हणूनच धार्मिक स्थळांना लष्कराची सुरक्षा द्या, असे आधीच सत्यपाल मलीक म्हणाले आहे. त्यामुळे आता भाजपाकडून राम मंदिरालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे नाना पटोले म्हणाले.

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
Mira Road, Bangladesh nationals arrested ,
सैफ प्रकरणानंतर बांगलादेशींची धरपकड सुरू, मिरा रोडमधून ३ बांगलादेशी नागरिकांना अटक

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस माझ्यामुळेच मुख्यमंत्री…!”, नाथाभाऊ स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्यांची सुडाची वृत्ती…”

हेही वाचा – “शिंदे गटाचे ४० आमदार अपात्र ठरणार”, नाना पटोलेंची भविष्यवाणी, ‘शेड्यूल १०’चा दिला संदर्भ

नाना पटोले यांनी बेरोजगारांचा प्रश्नावर सरकारला घेरले आहे. नाना म्हणाले की, आता शासकीय नोकऱ्यांचे कंत्राट खासगी कंपन्यांना दिले जात आहे. खाजगी कंपनी पैसे कमविण्यासाठी बेरोजगार तरुण तरुणींकडून परिक्षा शुल्काच्या नावावर अधिकचे पैसे वसूल करून बेरोजगार तरुण तरुणींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप करीत आहे. सरकारने याची गंभीर दखल न घेतल्यास याचे परीणाम सरकारला लवकर भोगावे लागतील, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

Story img Loader