नागपूर: मराठा आरक्षणावरून या सरकारने रस्त्यावरचे भांडण चव्हाट्यावर आणले आहे. मंत्रालयात बसून ओबीसी आणि मराठ्या नेत्यांना सोबत घेत हा प्रश्न सोडवता आला असता. परंतु सरकारला हे करायचे नव्हते. त्यामुळे भाजपने जाती- जातीत लावलेली आग हे सामाजिक कलंक आहे, अशी टीका काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना केला.

नाना पटोले म्हणाले, भाजपने मराठा धनगर आणि वेगवेगळ्या जातींना आरक्षणाचे गाजर दाखवून प्रत्यक्षात काही केले नाही. परंतु आता या भाजप- शिंदे सरकारला सभागृहात हे उत्तर द्यावे लागेल.

Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : लोकशाहीत टीका अविभाज्य घटक
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
vhp on ayan mishrea murder case
Aryan Mishra Murder : गोरक्षकांकडून आर्यन मिश्राची हत्या, हिंदुत्ववादी संघटनांनी हात झटकले; म्हणाले, “हिसांचाराचे समर्थन नाही”
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 
eknath shinde, Pratap Sarnaik,
साहेब असा अंगठा दाखवून चालणार नाही, निधी द्यायलाच लागेल; आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांसमोरच निधीची मागणी
Criticism of the government is Naxalism
सरकारवर टीका म्हणजे नक्षलवाद नव्हे!

शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज जसे सुरतला गेले होते तसे आम्हीही सुरतला गेलो होतो. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज सुरतला लुटलेला खजिना परत आणण्यासाठी गेले होते. परंतु हे गुलामगिरीसाठी गेले. त्यांना कस्टडीत ठेवण्यात आले होते. त्यातला एका नेत्याला दूरचित्रवाणीवर विचित्र हलतान- डोलताना लोकांनी बघितले.

हेही वाचा… ‘यलो मोझॅक’मुळे सोयाबीनचे उत्पादन घटले, ४९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका

अजित पवारांनी पीएचडी संदर्भात केलेले वक्तव्य हे शैक्षणिक व्यवस्थेच्या विरोधात भाजप सरकार आहे हे दर्शविणारे आहे आणि हा माजही त्यांच्या वर्तनातून आणि बोलण्यातून दिसतो, असेही पटोले म्हणाले. केंद्र सरकार सर्वच सहकारी संस्था आणि शासकीय संस्थांमध्ये स्वत:चा हस्तक्षेप वाढविला आहे. सगळ्या गोष्टी आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचे हे प्रयत्न योग्य नाहीत, असेही त्यांनी सांगितले.