नागपूर : मिहानमधील प्रकल्प नागपूरबाहेर गेले, एका जडीबुटीवाल्या बाबाला प्रकल्पासाठी जमीन दिली, पण अद्याप प्रकल्प उभा राहिलेला नाही. उलट मिहानमध्ये प्रस्तावित काही प्रकल्प गुजरातला गेले, जेव्हा भाजपचे सरकार असते तेव्हा विदर्भाचे नुकसानच झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते विदर्भ-मराठवाडाच्या विषयावर बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील २०१४-१९ मधील भाजप सरकारने एका जडीबुटीवाल्या बाबाला मिहानमधील जमीन दिली पण आजपर्यंत या जमिनीवर कोणताही प्रकल्प उभा राहिलेला नाही. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल असे स्वप्न दाखवले गेले. पण हा प्रकल्पच अद्याप सुरू झालेला नाही. मिहान हे विदर्भासाठी महत्त्वाचे आहे. पण येथील सगळे उद्योग बाहेर जात आहेत, इथले काही प्रकल्प गुजरातला पाठवले. जेव्हा भाजपचे सरकार असते तेव्हा विदर्भाचे नुकसानच झाले आहे.

Delhi Election Results 2025 news in marathi
दिल्लीतील भाजपच्या अभूतपूर्व यशाचे समीकरण; नीतीत बदल, सूक्ष्म व्यवस्थापन, मोदींचे नेतृत्व!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
BJP target for Bihar Chief Minister post after victory in Delhi assembly elections
दिल्लीच्या विजयानंतर भाजपचे पुढील लक्ष्य बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर
devendara fadnavis said nagpur is unique chhatrapati shivaji maharaj brought tigers claws to defeat Afzal Khan
फडणवीस म्हणाले, “नागपूर आमचे वेगळेच शहर, अजब…”
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
Dhananjay Munde pankaja munde Chief Minister devendra fadnavis visit Beed
मुख्यमंत्र्यांच्या बीड दौऱ्यात मुंडे बंधू-भगिनींना डावलले
Rane family on Sindhudurg DPDC
सिंधुदुर्ग डीपीडीसी पूर्णपणे राणे कुटुंबीयांच्या ताब्यात; इतर कोणत्या जिल्ह्यात एकाच कुटुंबाचा वरचष्मा?

हेही वाचा: तरुणीने आधी बाळाला दिला जन्म मग दाखल केली बलात्काराची तक्रार, विवाहित प्रियकर फरार…

सूरजागड येथे ४०० वर्षे पुरेल एवढे मोठ्या प्रमाणात लोह खनिजाचे साठे आहेत. हा प्रकल्प झाल्यास महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लागू शकतो, भिलाईपेक्षाही मोठा प्रकल्प याठिकाणी होऊ शकतो. हा प्रकल्प झाला पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे. सरकार लक्ष घालत नसेल अथवा आम्हाला उत्तर मिळणार नसेल तर काँग्रेस आमदार सूरजागडला भेट देऊन तिथली वस्तुस्थिती जनतेसमोर मांडतील, असेही ते म्हणाले.

Story img Loader