राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद तसे महत्त्वाचे. त्याला संवैधानिक दर्जा मिळाला २०१८ ला. तो देताना केंद्रातील मोदी सरकारने मोठा गाजावाजा केलेला. देशभरातील इतर मागासवर्गीयांचे तारणहार आम्हीच. केवळ आमचाच पक्ष या घटकाला न्याय देऊ शकतो असे त्याचे स्वरूप होते. तेव्हा अनेकांना वाटले आता ओबीसींच्या सर्व समस्या लवकरच सुटणार. त्यामुळे साऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. त्यात भर पडली ती या पदावर हंसराज अहीर यांच्या नेमणुकीची. ते चंद्रपूरचे. लोकसभेत पराभूत झालेले. मात्र देशभर गाजलेला कोळसा घोटाळा समोर आणण्याचे पुण्य त्यांच्या नावावर होते. भाजपला सत्ता मिळवून देण्यात याचा वाटा मोठा. त्याचीच परतफेड म्हणून की काय, त्यांची वर्णी लागली. तेव्हा ही नियुक्ती राज्यातील साऱ्यांना दुधात साखर पडल्यासारखी वाटली. याला आता चार वर्षे होत आलेली. या काळात नेमके काय घडले, अहिरांनी काय केले याचा धांडोळा घेतला तर पदरी शून्य पडते. एवढे महत्त्वाचे पद मिळूनही अहीर ओबीसींच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अपयशी ठरले असतील तर त्याला जबाबदार कोण? केंद्रातले सरकार की खुद्द अहीर?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा