नागपूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनच्या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची जितकी बदनामी करता येईल तितकी बदनामी भाजप आणि शिंदेंची शिवसेना करीत असतानाच खुद्द अजित पवार यांचे विदर्भातील कट्टर समर्थक व वरूड मोर्शीचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी ते महायुतीचे घटक असताना केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले. कारण ते महायुती सरकारमध्ये मंत्री आहे. पण त्यांच्या पक्षाच्या माजी आमदाराने मात्र भाजपचा दबाव झुगारून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती माध्यमांकडे प्रसिध्दीला पाठवली आहे. त्यानुसार माजी आमदार देवेंद्र भुयार म्हणतात “भारत कृषीप्रधान देश आहे, मात्र या कृषीप्रधान देशात कृषीक्षेत्राचे हब बनवण्याऐवजी पर्यावरणपूरक खेळण्यांचा हब बनवण्याच्या घोषणा होतात ही, शोकांतिका आहे. केंद्र सरकारचा शेती क्षेत्राबाबतचा दृष्टीकोन यामधून स्पष्टपणे दिसून येतो. वास्तविक पाहता आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्डची कर्जमर्यादा वाढविली, डाळींच्याबाबतीत देश आत्मनिर्भर करण्याची घोषणा केली. धनधान्य कृषी योजनेची घोषणा केली. मात्र हे सर्व करत असताना, सिंचन तसेच पायाभूत सुविधांची कोणतीच घोषणा केली नाही. तसेच ते खते, बि-बियाणे, किटकनाशके, शेती औजारे यावरती ६ टक्क्यांपासून ते ३० टक्क्यापर्यंत जीएसटी लावण्यात आलेली आहे. यामधून जीएसटी करामध्ये सवलत देवून शेती व्यवसायाला बुस्टर डोस देण्याची गरज होती. एकीकडे वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, केंद्र सरकारचे आयात निर्यातीबाबतचे अस्थिर धोरण, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे देशभरातील शेतकरी पिचलेला आहे” ,अशी प्रतिक्रिया माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.