लोकसत्ता टीम

नागपूर : शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वर्धा मार्गावर ‘नो राईट टर्न’ उपक्रम सुरू केला. परंतु, मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर केलेला हा प्रयोग अंगलट येत असल्याचे चित्र आहे. फक्त प्रयोगच करायचा असेल तर पोलीस उपायुक्तांनी वाहनचालकांना वेठीस धरू नये, अशा नकारात्मक प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहेत.

Pune Man Expressed Unique Agitation About The Bad Roads In Pune Video goes Viral on social media
पुणेकर काकांचा नाद नाय! खराब रस्त्यांना कंटाळून महानगरपालिकेच्या गेटवर केलं पुणेरी स्टाईल आंदोलन; VIDEO व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
GBS Pune, GBS, bacteria , private tankers, pune,
पुणे : १५ ठिकाणी खासगी टँकरच्या पाण्यातच जीवाणू असल्याचे उघड !
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
rto measures for safe travel on the Mumbai-Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी उपायांची जंत्री
Bandra Worli sea bridge coastal raod will be inaugurated by CM Fadnavis on Republic Day
सागरी किनारा मार्ग पूर्णक्षमतेने सुरू होणार, सागरी किनारा आणि वरळी वांद्रे सागरी सेतू जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी लोकार्पण
badlapur biogas project in controversy again after bjp corporator allegations
बदलापुरात एका तपानंतरही बायोगॅसची प्रतीक्षाच; भाजपच्या नगरसेवकाच्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्प पुन्हा वादात
Chemical container accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावर रासायनिक कंटेनरचा अपघात

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. महाल, इतवारी, लकडगंज, मेडिकल चौक, जरीपटका, पाचपावली, खामला अशा अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असताना उपायुक्तांनी केवळ प्रयोग करायचा म्हणून कार्यालयाजवळ असलेल्या मॉरिस चौक ते कृपलानी चौकाची निवड केली. मात्र, या प्रयोगामुळे नागपूरकर त्रस्त झाले आहेत. अनेक वाहनचालकांना उजव्या बाजूला वळण घेऊन फक्त अर्धा किलोमीटर जायचे असते. मात्र, आता त्यासाठी तीन ते चार किमीचा फेरा मारावा लागत आहे.

आणखी वाचा-नेत्यांनो, मत मागायला येऊ नका! नागपुरातील पांगूळ वसाहतीत फलक

नागरिक काय म्हणतात? …ही तर हुकूमशाही!

वर्दळीच्या वर्धा रोडवर प्रयोग करण्यापूर्वी वाहतूक पोलीस उपायुक्तांनी रस्ता, गर्दी आणि उजवे वळण याचा नीट अभ्यास करायला हवा होता. केलेला प्रयोग जनतेसाठी सोयीचा आहे की अडचणीचा, याचाही विचार करायला हवा होता. लगेच आदेश देऊन थेट रस्त्यावरील वळणे बंद करणे, ही हुकुमशाही झाली. शहरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावर उपायुक्तांना काही तोडगा काढता येईल का? तीन वर्षानंतर उपायुक्त शहरातून जातील, मात्र, हे प्रश्न असेच कायम राहतील. असे प्रयोग जनतेच्या व तज्ज्ञांच्या सूचनेनंतरच केले पाहिजे. -प्रभू राजगडकर.

आधीचा प्रयोग अयशस्वी

यापूर्वीसुद्धा आठवडाभरासाठी मॉरेस टी पॉईंट ते कृपलानी चौक यादरम्यान ‘नो राईट टर्न’ उपक्रम राबवण्यात आला. तो अयशस्वी ठरला. या उपक्रमाची वेळ सायंकाळी ५.३० पासून ८.३० पर्यंत ठेवण्यात आली. ही वेळ खूप घाईची असते. रस्त्यावर वाहनांची वर्दळ खूप असते. त्यामुळे वाहनचालकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. पोलीस उपायुक्तांनी असे प्रयोग करू नये. -सूरज दहिकर.

आणखी वाचा-दिवाळीत सोने ८५ हजारांचा टप्पा ओलांडणार! आजचे दर बघून ग्राहकांमध्ये…

महाल-इतवारीचा विचार का नाही?

सिव्हिल लाईनमध्ये अनेक शासकीय कार्यालये आहेत. सर्वाधिक अधिकारी-कर्मचारी मॉरिस कॉलेज चौक ते कृपलानी चौक हा रस्ता वापरतात. नव्या उपक्रमाचा फटका काचीपुरा चौक, पंचशील चौक व धंतोलीकडून येणाऱ्या वाहनचालकांना बसत असून तेथे वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे रहाटे कॉलनी, कृपलानी चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याऐवजी कोंडीत भर पडली आहे. वाहतूक पोलिसांनी खामला, महाल-इतवारीसारख्या परिसरात असे प्रयोग करुन दाखवावे. -डॉ. अमर मोंढे.

Story img Loader