अमरावती : आगामी लोकसभेची निवडणूक अतिशय महत्त्वाची असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. कुणी आमच्या वाटेला निष्कारण जात असेल तर आम्ही त्याला अजिबातही सोडणार नाही, असा आक्रमक इशारा देत विचारांची लढाई विचारांनीच लढावी लागेल, असे मत आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केले.

स्थानिक मानसरोवर सभागृहात आयोजित समाजमाध्‍यमांचा प्रभाव या विषयावरील बैठकीत ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय केळकर, आमदार प्रवीण पोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रदेश सचिव जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय आदी यावेळी उपस्थित होते.

Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Dhananjay Munde
“पहाटेची शपथ घेऊ नका असं सांगितलेलं तरी…”, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

हेही वाचा – “राज्यातील दंगलींमागे उद्धव ठाकरेंचाच हात”, नितेश राणेंचा आरोप, म्हणाले “नार्को टेस्‍ट करा…”

अमरावती लोकसभेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा. कर्नाटकात अराजकता तयार होत आहे. सत्तांतर झाल्यानंतरचा हा बदल लक्षात घेण्यासारखा असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले. समाज माध्‍यमांचा वापर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. नऊ वर्षांत केलेल्या कामाचा आलेख हा फार मोठा आहे, असे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. काळजीपूर्वक समाजमाध्‍यमांचा वापर करून २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.

हेही वाचा – राज्यात पशुवैद्यक विद्याशाखेचा विस्तार होणार; अकोल्यातील पदवी महाविद्यालय चालू सत्रापासूनच; १६४ पदांसह…

समाजमाध्यमातून सध्‍या अपप्रचार होत आहे. अशा अपप्रचाराला आपण आळा घालणे आवश्यक आहे. लोकांना सत्याची बाजू सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, असे आमदार संजय केळकर यावेळी म्हणाले. नऊ वर्षांत एकही घोटाळा नसल्याने संपूर्ण विरोधी पक्षातील नेते अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका त्‍यांनी केली.

Story img Loader