नागपूर : केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजयी पताका फडकावली. मात्र, उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात गडकरींचा जनाधार सातत्याने घटत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत येथे गडकरींना विकास ठाकरे यांच्या तुलनेत ३२ हजारांपेक्षा कमी मते मिळाली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलेले गडकरी यांनी सर्वप्रथम २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यांना पहिल्याच प्रयत्नात खासदारकी मिळाली. त्यानंतर २०१९ आणि २०२४ सलग विजय मिळवून त्यांनी ‘हॅट् ट्रिक’ साधली. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी नागपूर मतदारसंघातून अशी किमया केली होती. परंतु, मुत्तेमवार यांना पराभूत करून पहिल्यांदा संसदेत पोहोचलेल्या गडकरी यांना उत्तर नागपुरातील मतदारांच्या नापसंतीच्या सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत त्यांना या मतदारसंघात ९० हजार १९१ मते मिळाली तर काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी तब्बल एक लाख २२ हजार ४०६ मते घेतली. भाजप येथे काँग्रेसपेक्षा ३२ हजार २१५ मतांनी मागे राहिला. बसपने केवळ ६ हजार ६९२ मते मिळवली.

BJP state president MLA Chandrasekhar Bawankule appeal to Uddhav Thackeray regarding election
“उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदारसंघातून जिंकून दाखवावे,” भाजप प्रदेशाध्यक्षांचे आवाहन
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
satara congress seats marathi news
साताऱ्यात वाई, कराड दक्षिण, माण मतदारसंघाची काँग्रेसकडून मागणी
Bachchu Kadu in Achalpur Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Achalpur Vidhan Sabha Constituency : बच्चू कडू यांची घोडदौड कायम रहाणार? महायुती-महाविकास आघाडीपुढे उमेदवार निवडीचे आव्हान
In Uran tensions rise between Shiv Sena Thackeray and Shetkari Kamgar Party ahead of assembly elections
उमेदवारीसाठी शेकाप-ठाकरे गटात चुरस; उरण विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरू, काँग्रेसचाही दावा
in chandrapur before assembly elections old versus new conflict erupted in Congress
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये जुने विरुद्ध नवे संघर्ष
Pune, Thackeray group, Mahavikas Aghadi,
पुण्यात ठाकरे गटामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी
MP Udayanraje Bhosle and Shivendrasinhraje Bhosle met in the background of the assembly elections satara
उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे यांची भेट; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा

हेही वाचा…एसटी बसच्या प्रवासात सुट्टे पैसे नाही, या प्रणालीतून तिकीट काढणे शक्य

काँग्रेसच्या मताधिक्यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने संविधान बदलाचा मुद्द्यावर जोर दिला होता. तसेच बेरोजगारी, महागाई आणि निवडक उद्योगपतींना मोदी सरकार देशाची संपत्ती देत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे कधीनव्हे एवढे बौद्ध, दलित, मुस्लीम तसेच धर्मनिरपेक्ष मतदार काँग्रेसच्या बाजूला वळण्याचे दिसून येते. त्याचाच परिणाम म्हणजे बसपचे उमेदवाराला आजवरचे सर्वांधिक मतांवर समाधान मानावे लागले. बसपचे मतदारन बौद्ध, दलित, मुस्लीममध्ये सर्वांधिक आहे. मात्र, यावेळी या सर्व मतदारांनी भाजपच्या विरोधात आणि काँग्रेसच्या बाजूने मतमदान केल्याचे दिसून येते.

हेही वाचा…बुलढाणा जिल्ह्यात ‘ट्रॅव्हल्स’ उलटली; १७ प्रवासी जखमी

२०१९ च्या निवडणुकीत गडकरी यांनी येथे ८७ हजार ७८१ मते तर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी ९६ हजार ६९१ मते घेतली होती. या निवडणुकीत बसपने ९ हजार ९५१ आणि वंचित बहुजन आघाडीला ६ हजार ५७३ मिळाली होती. काँग्रेसने भाजपपेक्षा ८ हजार ९१० मते अधिक घेतली होती. २०१४ च्या निवडणुकीत गडकरी यांना येथे ७४ हजार ७४६ मते तर काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी ५६ हजार २०६ मते घेतली होती. भाजपला येथे १८ हजार ५४० एवढे मत्ताधिक्य होते. या निवडणुकीत बसपला ३३ हजार ६६३ आणि आपने ११ हजार २१८ मते घेतली.