महेश बोकडे

नागपूर : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ऊर्जा खात्यातील वीज कामगारांच्या प्रश्नावर चर्चेसाठी वारंवार वेळ मागत आहे. परंतु त्यांना वेळ मिळत नसल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने १ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.

Prime Minister Modi will distribute 18th PM Kisan and fifth Namo Shetkari installments on 5th october
आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ३९०० कोटी जाणून घ्या, कोणत्या योजनेचे किती पैसे मिळणार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
prahar association protest in front of collectors office for various demands of disabled
नाशिक : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे आंदोलन
NCP Sharad Pawar group leader Jitendra Awad allegation regarding the project contractor thane
प्रकल्प कंत्राटदार आधीच ठरतो मग, कंत्राट काढले जाते; राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Navi Mumbai, Naina area, PM Narendra Modi,
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
anganwadi workers announce chakka jam protest on 1 october across maharashtra
राज्यातील अंगणवाडी सेविका १ ऑक्टोबरला करणार चक्का जाम
Mokka action against the leader and accomplices of Enjoy Group in Gherpade Peth Pune news
घाेरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
CID , MIDC, Konkan, Bal mane, Uday Samant,
कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करा, बाळ मानेंची मागणी; उदय सामंत यांच्या खात्यावर आरोप

ऊर्जा खात्याच्या अखत्यारितील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांमध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी वीज कामगार गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत आहेत. दुसरीकडे या कंपन्यांमध्ये रिक्त पदे असतानाही त्यांना कायम केले जात नाही. डिसेंबर २०२२ मध्ये या कंत्राटी कामगारांना अतिरिक्त गुण देऊन सेवेवर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु फारसा लाभ झाला नाही.

हेही वाचा >>>अत्याचार पीडित बालिकेचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईच्या महिला डॉक्टरला अटक

ओडिशा, राजस्थान, पंजाब सरकारने तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नोकरीत घेतले आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही निर्णय घ्यावा किंवा रानडे समितीच्या अहवालानुसार वीज कंपन्यांतील नियमित रिक्त पदांवर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाच्या ६० वर्षांपर्यंत शाश्वत रोजगार द्यावा. कंत्राटदाराच्या मध्यस्थीऐवजी कंपनीने थेट कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे. त्याबाबत ऊर्जा खात्यासह संबंधित कंपन्यांना नोटीसही देण्यात आली आहे.

हे सरकार कंत्राटी कामगारांच्या प्रश्नासाठी वेळ देत नाही. त्यामुळे कंत्राटी कामगार नाराज आहेत. त्यामुळे १ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. – नीलेश खरात, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ.