देवेश गोंडाणे

नागपूर : राज्यभरातून कंत्राटी भरतीला होत असलेल्या विरोधाला न जुमानता शासनाने सेवापुरवठादार कंपन्यांकडून मनुष्यबळ घेण्याचा धडाका लावला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागातील ८२१ जागांवर थेट मनुष्यबळ घेण्याच्या निर्णयानंतर पुन्हा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात ५ हजार ५६ पदे भरण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षार्थींमध्ये प्रचंड अस्वस्थेचे वातावरण आहे.

Ban on plastic flowers for decoration decided High Courts question to Central Govt
सजावटीसाठीच्या प्लास्टिकच्या फुलांवरील बंदीचा निर्णय घेतला का? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
धारावीकरांसाठी देवनारमध्येही भूखंड; क्षेपणभूमीची १२५ एकर जागा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
High Court warns State Governments Urban Development Department over implementation of fire safety rules
अन्यथा सर्व बांधकामांच्या परवानग्या रोखू, अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवरून न्यायालयाचा इशारा
Maharashtra State Government Directorate of Archeology and Museums Recruitment for the Vacant
राज्यात कंत्राटी नोकरभरती सुरूच… आता १०९ पदांचे काम कंत्राटी तत्त्वावर…
Objection notice submitted by consumer panchayat on housing policy regarding ownership of Zopu plot Mumbai news
झोपु भूखंडाची मालकी विकासकांना देण्यास विरोध! गृहनिर्माण धोरणावर ग्राहक पंचायतीकडून हरकती-सूचना सादर
Investigating land fragmentation projects letter of MHADA  a committee has been formed by the Nashik district administration
भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन
Pench tiger project administration, Villagers
पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर

शासनाने सेवापुरवठादार संस्थांची निवड करून त्यांच्यामाध्यमातून बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिंग) माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला. राज्यभरातून या निर्णयाचा विरोध होत असून शासन निर्णय मागे घेत नियमित पदभरतीची मागणी केली जात आहे. मुंबईपासून पुणे, नागपूर, अमरावती, वर्धा अशा सर्वच शहरांमध्ये आंदोलने सुरू आहेत. यानंतरही शासनाने दोन दिवसांआधी इतर मागास बहुजन कल्याण विभागातील ८२१ जागांवर कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जाहीर केला. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात तब्बल ५ हजार ५६ पदे भरली जाणार आहेत. हा शासन निर्णय आल्याने पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा >>> Kotwal Recruitment: कोतवाल पदासाठी उच्चशिक्षितही रांगेत!; १५७ जागांसाठी खोऱ्याने अर्ज…

राज्यभरात विविध ठिकाणी कंत्राटी भरती विरोधात आंदोलने सुरू असतानाही सरकारने हा शासन निर्णय काढणे म्हणजे आमच्या विरोधाला सरकार कडीचीही किंमत देत नाही. येत्या काळात अनेक विभागात याप्रकारे कंत्राटी जाहिराती काढून नियमित पदांसाठी नगण्य अशा जाहिराती येण्याची शक्यता असेल. – स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य.