लोकसत्ता टीम

बुलढाणा : शेगाव तालुक्यातील गावातील केस गळती आणि टक्कलग्रस्त रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत आज दुप्पट झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. या विचित्र आणि अनामिक आजाराची रुग्ण संख्या शंभरवर पोहोचली आहे.

month passed since Shegaons mysterious hair loss disease with no treatment or report received
केसगळती : महिना उलटला, पण रुग्ण कमी होईना अन् अहवालही मिळेना
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
479 leprosy patients found in Raigad district
रायगड जिल्ह्यात ४७९ कुष्ठरोगी आढळले, आदिवासी बहुल तालुक्‍यात कुष्‍ठरूग्‍ण संख्‍या गंभीर
Nine years of delay in transferring health centers causes patient suffering due to controversy
आरोग्य केंद्रे हस्तांतरण वादाचा रुग्णांना फटका, केंद्रांच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
Hair identifier spray
शेव्हिंग करण्यापूर्वी हेअर आयडेंटिफायर स्प्रेचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Causes of unwanted hair growth
Facial Hair : हनुवटी आणि गालावर भरपूर केस येतात? मग ‘ही’ असू शकतात कारणे; करू नका दुर्लक्ष
Bhandara, woman deadbody , tiger attack, tiger ,
भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार, पोलीस ठाण्यात…
One GBS patient detected in Sangli city and five to six in rural areas all receiving treatment in private hospitals
सांगलीत ‘जीबीएस’चे सहा रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क, उपचार सुरू

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनामिक आजाराने अकरा गावात शिरकाव केल्याचे चित्र आहे. काल संध्याकाळी रुग्ण संख्या ५१ होती, नंतर ती ६८ झाली होती. दरम्यान, आज शेगाव तालुक्यातील अन्य गावात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ती आज संध्याकाळ पर्यंत शंभर पर्यंत पोहोचली आहे. आज, गुरुवारी जवळा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गतच्या तरोडा कसबा गावात दहा रुग्ण आढळून आले आहे. जलंब केंद्र अंतर्गतच्या माटरगाव आठ, पहूरजिरा बारा, नींबी पाच रुग्ण आढळून आले. आज अखेर अकरा गावात शंभर रुग्ण आढळून आले आहे. यामुळे बाधित रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आणखी वाचा-नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…

पाण्यात नायत्रेटचे प्रमाण जास्त

यापैकी काही गावातील पाण्याचे नमुने जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाला आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या पाण्यात नायत्रेटचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण एक लिटर पाण्यात दहा मिलिग्राम असायला हवे, मात्र ते प्रमाण चौपन्न मिलिग्राम असल्याचे आढळून आले आहे. तसेच क्षाराचे (टिडीस) प्रमाण एकवीसशे निघाले असून सामान्य स्थितीत ते केवळ एकशे दहा इतके असायला पाहिजे, असे वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यावर कळस म्हणजे या पाण्यात घातक असे आरसेनिक व लीड आढळून आले आहे. याची तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader