नागपूर : सध्या प्रत्येकाच्याच हाती स्मार्टफोन आला आहे. यातून सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडीओ शेअर करणे, व्हायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र अशा पोस्ट केल्याने आयुष्यभरासाठी नोकरीतून हात धुण्याची वेळ येऊ शकते.

शासकीय, खासगी नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्राची गरज असते. यासाठी गुन्हा दाखल नसला तरच नोकरी मिळण्याची संधी आहे. सोशल मीडियाचा वापर तरुणांनी मोठ्या जबाबदारीने करण्याची वेळ आली आहे. एका आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओने तरुणांना कायमचे नोकरीतून हात धुण्याची वेळ येऊ शकते. आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे अनेकांना चांगलेच अंगलट आले आहे. दंगलीच्या काळात दगडफेक करणाऱ्यांना तर तुरुंगाची हवा खावी लागली आहे. जीवनात आलेल्या नोकरीच्या संधीवरही पाणी सोडावे लागले आहे. यासाठी सजग राहून गुन्हेगारीवृत्तीपासून तरुणांनी दूर राहण्याची गरज आहे.

Dr Neelam Gorhe suggestion regarding against women oppression Pune news
महिला अत्याचाराच्या विरोधात सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज- डाॅ. नीलम गोऱ्हे यांची सूचना
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Cleanliness is vital for environment some leaders guide world but they fail to act themselves
राजकीय नेते जगाला मार्गदर्शन करतात, मात्र स्वत: काहीच….गडकरींनी पुन्हा टोचले कान….
Manager Fired HR
मॅनेजरचा CV क्षणार्धात नाकारला, एचआरची नोकरीच गेली; नेमकं काय घडलं वाचा!
narhari zirwal on son gokul zirwal
“सरकार आमचं ऐकत नाही, हे म्हणण्याची वेळ आली आहे”, नरहरी झिरवाळांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर!
cops molested young lady attempted kidnapping two vasai policemen suspended
पोलिसांकडूनच तरुणीचा विनयभंग, अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी पोलिसांना चोपले, वसईतील दोन पोलीस निलंबित
online rummy, High Court, State Govt,
ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
railway employees
Railway Employees Arrested : धक्कादायक! वरिष्ठांकडून स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रॅक फेल करण्याचा प्रयत्न; तिघांना अटक

हेही वाचा – वाशीम: अन्याय अत्याचाराविरोधात वंचितचा जन आक्रोश मोर्चा!

सार्वजिनक ठिकाणी गोंधळ घालणे, दंगलीत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असेल तर थेट गुन्हे दाखल केले जातात. यातूनच भविष्यात करिअरच्या स्वप्नांचा पार चुराडा होतो. फेकण्यासाठी हातात दगड घेण्यापूर्वी अथवा एखादी लिंक, व्हिडीओ गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरण व्हायरल, शेअर करण्यापूर्वी तरुणांनी हा विचार करण्याची गरज आहे. गत सहा महिन्यांत अनेक तरुणांना आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे महागात पडले आहे.

याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो

कलम ४२७ : जाळपोळ करणे, सार्वजिनक शांतता भंग करणाऱ्यांवर ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला जातो.

कलम १८८ : सार्वजनिक ठिकाणी तोडफोड करणे, पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार कारवाई केली जाते.

कलम १४४ : बेकायदेशीरपणे जमाव एकत्र करणे, कायद्याचे उल्लंघन करणे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात येते.

हेही वाचा – अकोला : कपाशी व ज्वारीचे २० टक्के जादा बियाणे वापरावे लागणार, पाऊस लांबल्याने पेरणीला दिरंगाई झाल्याचा परिणाम

कलम १५३ : एखाद्या मुद्यावर भडक भाषण देणे, तापलेल्या प्रकरणाला आणखी तापविण्यासाठी भाषण करणाऱ्यांवर २५३ अन्वये गुन्हा दाखल होतो.

कलम ३५३ : शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३५३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येतो,

कलम १०९ : समाजात अपप्रेरणा, चिथावणी, भडकावणी, दंगलीला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कलम १०९ अन्वये कारवाई करण्यात येते.