लोकसत्ता टीम

नागपूर: आरोग्य विभागातील सुमारे ११ हजार जागांची भरती केली जाणार आहे, यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीची मदत घेण्यात आली आहे. यासाठी दहा ते ११ लाख अर्ज येण्याचा अंदाज प्रशासनााला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याच्या शक्यतेमुळे सर्व्हर किंवा तत्सम तांत्रिक यंत्रणा कोलमडून जाऊ नये यासाठी आरोग्य खात्याकडून पुरेशी दक्षता घेतली जात आहे. तानाजी सावंत यांनी आज दिले.

private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Prakash Abitkar marathi news
आरोग्य संस्थांना महिन्यातून किमान दोन वेळा अचानक भेटी द्या, आरोग्य मंत्र्यांच्या आरोग्य विभागातील वरिष्ठांना सूचना
How is the number of Guillain Barré syndrome patients increasing in the Maharashtra state print exp
राज्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांमध्ये वाढ कशी? धोका किती? उपचार महागडा का?
22 health care centers closed due to local opposition have to find new location
स्थानिकांच्या विरोधामुळे २२ आरोग्यवर्धिनी केंद्र अधांतरी, नवीन जागा शोधण्याची वेळ
GBS , patients, Government , private hospitals ,
जीबीएस रुग्णांना दिलासा! खासगी रुग्णालयांतील उपचाराच्या खर्चावर सरकारचे नियंत्रण
Role of government in public health
आरोग्य व्यवस्था ही सरकारचीच जबाबदारी! 
1 5 lakh senior citizen treated by the Maharashtra state public health department Mumbai print news
वृद्धापकाळातील आरोग्य सेवा गतिमान करणार! वर्षभरात साडेदहा लाख वृद्धांवर उपचार…

आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेबाबत या खात्याचे मंत्री डॉ. सावंत यांनी रविवारी मुंबईत बैठक घेतली. भरतीप्रक्रिया सर्वात मोठी आहे. यापूर्वीच्या परीक्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गैरप्रकार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तशा प्रकारचा कुठलाही गैरप्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षेत व्हायला नको. परीक्षेसाठी १०ते ११ लाख अर्ज येण्याची शक्यता लक्षात घेता सर्व्हरची क्षमता वाढवावी, इतर तांत्रिक बाजू मजबूत कराव्या ज्यामुळे परीक्षार्थ्यांना अडचणी येणार नाही. याचे नियोजन करा, अशा सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या.

आणखी वाचा-अकोला महापालिकेचा निगरगट्टपणा; अखेर गणेशभक्तांनीच रस्त्यावरील खड्डे बुजवले

भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ तयार करावा. भरतीचे तारीखनिहाय वेळापत्रक देण्यात यावे, परीक्षा केंद्रांची आत्तापासूनच निश्चित करावी, उमेदवारांना परीक्षा केद्रांवर येताना असलेले नियम प्रवेशपत्रावर नमूद करावे. असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले. बैठकीला विभागाचे व कंपनीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader