लोकसत्ता टीम

बुलढाणा: अस्मानी सुलतानीचा जबर तडाखा बसलेल्या लाखो शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. त्यामुळे वाटल्यास विकासमांचा निधी वर्ग करून आणि निकषांचा बाऊ न करता मदत करा. असे न केल्यास शेतकरीच काय आम्ही देखील हातात दगड घेऊ. कायदा-बियदा जुमानणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

ना. वडेट्टीवार यांनी आज गुरुवारी ( दि ३०) सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ येथील पिकनुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. यानंतर निवडक माध्यमांशी बोलतांना त्यांनी राज्य सरकारला वरील शब्दात खडे बोल सुनावले. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस असा चोहोबाजूनी संकटात अडकला आहे. मानसिक, आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. पीकविमा कंपन्यांची मस्ती वाढली असून ते शेतकऱ्यांशी अडवणूक करीत आहे.

आणखी वाचा-‘वाईन महोत्सव’ २ डिसेंबरपासून; नाशिकच्या द्राक्षांपासून निर्मित वाईनची मजा नागपुरात घेता येणार

भयावह स्थितीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या लाखो शेतकऱ्यांना तात्काळ तेही निकषांपलीकडे जाऊन मदत करणे काळाची गरज आहे. सरकार नुसतेच निकष निकष करीत बसले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. सरकार असेच ढिम्म राहिले तर शेतकरी हातात दगड घेतील, त्यांच्या समवेत आम्ही देखील हातात दगड घेऊ असा परखड इशारा वडेट्टीवार यांनी दिला. तेंव्हा आम्ही कायद्याची देखील तमा बाळगणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.

शेतकरी वाचला पाहिजे

राज्य सरकारने शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदत, भरपाई, पीक विम्याची रक्कम तातडीने देणे आवश्यक आहे. उधोगपतींचे करोडोंचे कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांनी काय घोडे मारले? असा सवाल त्यांनी केला. नुकसान भरपाई देतांना पिकांची वर्गवारी करून मदत घ्यावी अशी सूचना त्यांनी केली. पिकांचा, फळांच्या एकरी लागवड खर्चात फरक असतो पण मदत सारखीच दिली जाते हे कितपत योग्य ? असा सवाल विरोधी पक्षनेत्याने यावेळी केला.यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे, शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव ,सरपंच निवृत्ती कठोरे यासह शेतकरी उपस्थित होते.

Story img Loader