नागपूर : केंद्र व राज्य शासन सातत्याने नागरिकांना अवयवदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती करते. परंतु अद्यापही गरजेच्या तुलनेत मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदान होत नाही. तरीही नागपुरात यावर्षी १८ मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदान झाल्याने ही संख्या नवीन विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे नागपूर विभागात अवयव प्रत्यारोपणाला बळ मिळत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> लोकजागर- निवडणूक आख्यान – एक

Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
polling stations Pune district, Pune district remote areas, Pune, Pune latest news,
पुणे : जिल्ह्यातील ३८ मतदान केंद्रे दुर्गम भागात, ‘मोबाइल नेटवर्क’ही मिळेना
temple Goregaon Mulund road, temple removed Goregaon Mulund road,
गोरेगाव मुलुंड जोडरस्त्याआड आलेले ४० वर्षे जुने मंदिर हटवले, पालिकेच्या विभाग कार्यालयाची कारवाई
Chance of rain in Mumbai, rain Mumbai,
मुंबईत पावसाची शक्यता
Financial crisis of MMRDA from urban development department Mumbai news
नगरविकास विभागाकडून एमएमआरडीएची आर्थिक कोंडी; मेट्रोचा निधी नागरी परिवहन निधीत वर्ग; प्रकल्पातील अडचणीत वाढ
Polling stations in schools faced objections in Hingana assembly constituency Nagpur district
भाजप आमदाराच्या शाळेत मतदान केंद्र, राष्ट्रवादीचा आक्षेप…
rain Mumbai , Mumbai rain news, Mumbai latest news,
मुंबईत पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

एका मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना जीवदान मिळू शकते. नागपूर जिल्ह्यात २०१३ पासून अवयवदानाला सुरुवात झाली. ८ मे २०२४ रोजी नागपूर विभागात १४८ मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदान झाले. त्यातून अनेकांना जीवदान मिळाले. २०२३ मध्ये सर्वाधिक ३५ मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाले. १ जानेवारी २०२४ पासून ८ मे २०२४ पर्यंत नागपूर विभागात एकूण १८ मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाले. केवळ साडेचार महिन्यात १८ मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाले. ही संख्या यंदा नवीन विक्रम नोंदवेल, असा विश्वास विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने व्यक्त केला आहे.

शेतमजुराकडून अवयवदान..

वर्धा जिल्ह्यातील सुखदेव बोबडे (४४) या शेतमजुराचा दुचाकीने अपघात झाला. उपचारासाठी त्यांना वर्धेतील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल केले गेले. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचा मेंदूमृत झाल्याचे पुढे आले. नातेवाईकांचे समुपदेशन केल्यावर त्यांनी अवयवदानाला परवानगी दिली. त्यानंतर रुग्णाचे दोन मूत्रपिंड व एक यकृत दुसऱ्या रुग्णात प्रत्यारोपित केले गेले.