वाशीम : राज्यातील उस्मानाबाद आणि औरंगाबाद शहराचे धाराशिव, संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर आता वाशीम शहराचे नाव बदलून वत्सगुल्म करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली असून सोशल मीडियावर देखील प्रचार, प्रसार होत आहे.

हेही वाचा >>>यवतमाळमध्ये जमिनीत झाला स्फोट! भूमिगत पाईपलाईन फुटली अन्…; थरकाप उडवणारा Video एकदा पाहाच

Chief Election Commissioner Rajeev Kumar expressed concern over the demoralization of voters in urban areas print politics news
शहरी मतदारांच्या निरुत्साहाबाबत चिंता
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Loksatta lokshivar Decline in production due to root rot of ginger and turmeric crops
लोकशिवार: आले, हळदीची कंदकुज !
Threat letter to Navneet Rana again second time threat from Hyderabad in three days
खळबळजनक! नवनीत राणांना पुन्हा धमकीचे पत्र, तीन दिवसांत दुसऱ्यांदा हैदराबादमधून धमकी
Violation of conditions laid down in the SOP by the builders
नवी मुंबई : बांधकाम नियमावलीचे कागदी घोडे
Puneri pati viral for parking in his spot no parking funny puneri pati goes viral
पुणेकरांचा विषयच हार्ड! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना दिली थेट धमकी; ‘ही’ पुणेरी पाटी वाचून पोट धरुन हसाल
Congress Leader Statement on Veer Savarkar
Veer Savarkar : “वीर सावरकर ब्राह्मण होते तरीही गोमांस खायचे, त्यांनी..” काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद
Puneri patya viral puneri pati on wife funny video goes viral on social media
“बायकोचा राग आला तर…” तरुणानं पुणेरी पाटीवर लिहला उपाय; रस्त्यावर सगळेच पुरुष थांबू लागले, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

जवळच निजामशाही असल्यामुळे उर्दूमिश्रित शब्दांचा प्रभाव या ही परगण्यात झाला. त्यामुळे वत्स या शब्दाचा वच्छ आणि गुल्म शब्दाचा उम असा अपभ्रंश झाला. त्यापासून वच्छोम, वाच्छिम आणि वाशीम असा शब्द तयार झाला. वाशीमचे नाव वत्सगुल्म करावे, ही मागणी जुनीच आहे.१९९९- २००० च्या दरम्यान या मागणीने जोर धरला होता. अनेक वर्ष शहरात वत्सगुल्म (वाशीम) असे दुहेरी नाव वापरा असे फलक झळकत होते. विद्यमान सरकारने नुकतेच संभाजीनगर आणि धाराशिव ही नामांतरे केल्यामुळे वाशीमकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा >>>गोंदिया : आरोग्यवर्धिनी केंद्राच्या लोकार्पणाचा मुहुर्त कधी? दोन वर्षांपासून इमारत तयार, कामकाज अद्याप नाहीच

विद्यमान शासनाची अनुकूलता लक्षात घेवून वत्सगुल्म नामांतर जनजागरण मंच वत्सगुल्मच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रा. दिलीप जोशी, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, व्यापारी मंडळाचे जुगलकिशोर कोठारी, शिवसेना शहर प्रमुख श्याम दुरतकर, वसंतराव धाडवे, मधुसुदन काकानी, बंटी शेठी, यश काष्टे, राजू कलवार, रामभाऊ ठेंगडे फौजी, मनोज जैस्वाल, छायाताई पवार, वृषाली टेकाळे, प्रांजल काकानी, शिवाणी गोगे, अजय ढवळे, पंकज गाडेकर, सुनील देशमुख, आतिषसिंह कश्यप, जयपाल साबळे व आदी उपस्थित होते. तसेच विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते सरसावले असून सोशल मीडियातून देखील मागणीने जोर धरला आहे.