अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर : राज्यातील बेपत्ता मुली आणि महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या सहा महिन्यांत राज्यातील ४ हजार ४३४ मुली-महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यात २४५८ अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याची नोंद पोलीस विभागाकडे आहे.

Blood purification center, Kama Hospital,
मुंंबई : जी. टी. आणि कामा रुग्णालयातही रक्तशुद्धीकरण केंद्र
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
9.48 lakh customers in Vidarbha zero electricity payment from Mahavitraan
९.४८ लाख ग्राहकांना शून्य वीज देयक! ‘ही’ आहे योजना…
police patrolling for women safety during festivals thane news
उत्सवांच्याकाळात महिला सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीसांची गस्त
supreme court scraps caste based discrimination rules in jail
कारागृहे जातिभेद मुक्त; नियमावलींमध्ये तीन महिन्यांत बदल करा!; केंद्र, राज्यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
india s manufacturing sector hits 8 month low amid declining output
निर्मिती क्षेत्राची वाढ आठ महिन्यांच्या नीचांकी; सप्टेंबर महिन्यात पीएमआय निर्देशांक ५६.५ गुणांवर
amazon india announces significant reduction in selling fees
ॲमेझॉनकडून विक्रेत्यांच्या शुल्कात कपात; दिवाळीच्या तोंडावर पाऊल; राज्यातील १ लाख ८० हजारांना फायदा
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..

गेल्या पाच वर्षांची आकडेवारी लक्षात घेता राज्यातील १३ ते १७ या वयोगटातील मुले-मुली हरवण्याचे किंवा घरातून पळून जाण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयातून गांभीर्याने हालचाली होत नसल्यामुळे बेपत्ता झालेल्या गुन्ह्यांच्या तक्रारीला पोलीसही गांभीर्याने घेत नाहीत. मार्च महिन्यांत राज्यातून सर्वाधिक २ हजार २०० मुली-महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस विभागाकडे आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकनकर यांनी बेपत्ता मुली-महिलांची आकडेवारी जाहीर केल्यानंतर पोलीस विभागाने मुलींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे जवळपास ३० टक्के मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.

घर सोडण्याची कारणे काय?

पालकांकडून छळ, शिक्षणाची भीती, बाह्यजगाचे आकर्षण यामुळे पळून जाणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे. प्रेमात पडलेल्या अल्पवयीन मुली प्रियकरासोबत पळून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. नोकरीचा शोध, चित्रपटात कामाची आवड, शारीरिक आकर्षण, पती-पत्नीचे विवाहबाह्य संबंध, आणि नैराश्यातूनही काहींनी घर सोडल्याचे समोर आली आहे.

बेपत्ता झालेल्या मुली-महिलांची आकडेवारी

मुंबई – ७३८

ठाणे – ५१२

पुणे – ३३४

नागपूर – १८३

नाशिक – १६२

कोल्हापूर – ११२