वर्धा : राज्यातील विद्यार्थी संख्या किती? याचा तपशील शाळा निहाय पटसंख्या मोजून ठरतो. तशी आकडेवारी शिक्षण विभागाकडे उपलब्ध असते. मात्र अधिकृत ३ लाख ६५ हजार ७७८ विद्यार्थी असून, त्यापैकी १ लाख २१ हजार ९९७ विद्यार्थीच वैध असल्याचे शिक्षण विभागाच्या संकेतस्थळाने नमूद केले. नेमके काय तर ही अधिकृत संख्या आधार सलग्न विद्यार्थ्यांची आहे. मंगळवारी दिवसभर अशी तपासणी झाली.

हेही वाचा – कर्नाटक निवडणूक : प्रचारासाठी फक्त गडकरी व फडणवीसच पात्र, महाराष्ट्रातील बाकीच्यांचे काय?

Girl Student suicide hostel Chembur, suicide Chembur,
मुंबई : चेंबूरमधील शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Nagpur High Court , academic loss, student,
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी न्यायालयाने नियमांपलिकडे…
CET, new colleges in third round, CET news,
तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
girls admission vocational courses, girls Maharashtra admission,
राज्यातील १ लाख ३९ हजार मुलींनी घेतला व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश, ‘या’ अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती
Indian student prefer Ireland marathi news
भारतीय विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला पसंती… किती झाली विद्यार्थिसंख्या?
43 students mexico protest
‘त्या’ ४३ विद्यार्थ्यांसाठी मेक्सिको का पेटलंय? २०१४ मध्ये बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर नक्की काय घडलं?
Student Support Committee Pune  organization working for needy students
स्कॉलरशिप फेलोशिप: ‘विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे’; गरजू विद्यार्थ्यांचा पुण्यातला हक्काचा आधारवड

आधार असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व तत्सम लाभ देण्याचे धोरण आहे. त्यामुळे आधार संलग्न नसणारे विद्यार्थी अपात्र ठरल्याने गोंधळ उडतो. त्यासाठी अवैध ठरलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे इ आधार कार्ड प्रणालीत करणे आवश्यक ठरते. त्यानंतर स्टुडंट पोर्टलवर ते अद्यावत करणे भाग आहे. पोर्टलवर सुरक्षित व अद्यावत केल्यानंतरच विद्यार्थी वैध ठरण्याचे प्रमाण वाढेल, असे मत एका शिक्षक नेत्याने व्यक्त केले. ही प्रक्रिया किचकट ठरू नये म्हणून उपाय व्हावे, अन्यथा अवैध विद्यार्थी लाभ वंचित ठरतील. त्याचा त्रास मुख्याध्यापकांना होणार.