बुलढाणा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी यंदा १३ जून २०२४ रोजी आषाढी वारीसाठी पंढरपूर करिता मार्गस्थ होणार आहे. सकाळी ७ वाजता भक्तीमय वातावरणात धार्मिक सोपस्कार पार पाडून श्रींची पालखी संत नगरी शेगावातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करेल.

यंदा पालखीचे ५५ वे वर्ष असून शेगावहून जाताना ३३ दिवसांची पायदळ वारी करीत वारकरी पंढरीत दाखल होणार आहेत. १३ जून रोजी सकाळी ७ वाजता ७०० वारकरी भक्तांसंगे श्री संत गजानन महाराजांची पालखी विठ्ठलाच्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. पहिल्या दिवशी दुपारी नागझरी व रात्री पारस येथे मुक्काम राहील. ३३ दिवसांच्या प्रवासात पालखी ठिकठिकाणी मुक्कामी राहणार आहे. ऊन पावसाची तमा न बाळगता आणि शेकडो किलोमीटरचे अंतर करून १५ जुलै रोजी पालखी श्रीक्षेत्र मंगळवेढावरून विठुरायाच्या पंढरीत दाखल होणार आहे. पंढरपूर येथे १७ जुलै रोजी आषाढी सोहळा आटोपून पाच दिवसांच्या मुक्कामी राहणार आहे.

Gold Silver Price
Gold-Silver Price: घसरणीनंतर सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
R Madhavan Weight Loss Journey
ना जिम, ना धावणे, आर माधवनने ‘हे’ ७ नियम पाळून २१ दिवसांत कमी केलं वजन; नेमका हा फंडा कसा करतो काम, वाचा
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने जारी केला नवा जीआर; सुधारित शासन निर्णयातून कोणती घोषणा?
acb arrested lawyer for taking bribe for property document registration
दस्तनोंदणीसाठी लाच घेणाऱ्या वकिलाला पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई
Viral Vada Pav Girl Spotted With Ford Mustang Car Says Something big is coming soon While Users congratulated Her
‘या’ आलिशान कारमधून वडापाव विकणार का ‘वडापाव गर्ल’ ? नेमकं प्रकरण काय; पाहा व्हायरल VIDEO
nag panchami 2023
NAG PANCHAMI 2023 : उद्या नागपंचमी; जाणून घ्या महत्त्व, इतिहास; काय आहे वर्ज्य?
Things to keep in mind when having potatoes on your weight loss
वजन कमी करायचे आहे? बटाटा खाताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; तज्ज्ञ काय सांगतात, वाचा

हेही वाचा – आरटीईसाठी बनावट कागदपत्र प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक, हजारांवर पालकांवर होणार गुन्हे दाखल

हेही वाचा – यवतमाळ : संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले, काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

परतीचा प्रवास

नंतर २१ जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. पुन्हा २२ दिवसांचा पायदळ परतीचा प्रवास करीत श्रींच्या पालखीचे ११ ऑगस्ट रोजी स्वगृही प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या शेगाव नगरीत आगमन होईल. परतीच्या प्रवासात अंतिम टप्प्यात ही पालखी खामगाव येथे मुक्कामी राहणार आहे. वारीला जाऊ न शकणारे भाविक खामगाव ते शेगाव दरम्यान पालखीत मोठ्या संख्येने सहभागी होतात. ही परंपरा आता उत्सव झाला आहे.