गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बहुचर्चित असलेली अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना २४ ऑगस्टपासून जिल्हा परिषदेने विद्युत बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन बंद पडलेली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. न्यायालयाने तत्काळ ५० टक्के बिलाचा भरणा महावितरणला करून पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, असे निर्देश जिल्हा परिषदेला दिले.

अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून अर्जुनी मोरगाव नगरपंचायतसह जवळ परिसरातील १५ गावांना नियमित स्वच्छ पाणीपुरवठा केला जात होता. राज्य सरकारकडून येणारे प्रोत्साहन अनुदान २०१९- २० पासून बंद झाल्याने व जिल्हा परिषदेने योजनेची देखभाल दुरुस्तीकरिता कुठल्याही निधीचा नियोजन न केल्यामुळे जून महिन्यापासून विद्युत बिल थकीत झाले. बारा लाख रुपये विद्युत थकीत झाल्यामुळे जुलै महिन्यात विद्युत वितरण कंपनीने नियमानुसार नोटीस दिली आणि २४ ऑगस्ट रोजी विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे १५ गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला. परिणामी नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
New Tax Slab
१२ लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठीही टॅक्स स्लॅब, त्याचा नेमका अर्थ काय?
State Electricity Regulatory Commission imposes fine of Rs 1 lakh on Mahavitaran for new electricity connection without providing meter Mumbai news
मीटर न देताच नवीन वीजजोडण्या दिल्याने नाराजी; राज्य वीज नियामक आयोगाकडून महावितरणला एक लाख रुपये दंड
one nation one time
One Nation, One Time नक्की आहे तरी काय? सरकारने याचा मसुदा का तयार केला? याचा फायदा काय?
Loksatta explained What are the consequences of the privatization of electricity substations in the state
विश्लेषण: राज्यातील विद्युत उपकेंद्रांच्या खासगीकरणाचे परिणाम काय?
financial news loksatta
राज्य उत्पन्नाच्या प्रभावी अंदाजासाठी माहितीची गतीमान देवाणघेवाण आवश्यक, राज्य उत्पन्न सल्लागार समितीच्या बैठकीचा सूर
Ratnagiri-Nagpur highway only after paying four times compensation says Rajendra Patil Yadravkar
चौपट भरपाई दिल्यावरच रत्नागिरी – नागपूर महामार्ग, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा इशारा

हेही वाचा – वर्धा : रुग्णालयासाठी गावातील वृद्ध रस्त्यावर

हेही वाचा – नितीन गडकरींनी टोचले आमदार, खासदारांचे कान; सोशल मीडियावर चर्चेचे गुऱ्हाळ

माजी जि.प. सदस्य किशोर तरोणे यांनी वारंवार पाठपुरावा केला. परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. विद्युत पुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे किशोर तरोणे यांनी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने २८ सप्टेंबरला घेतलेल्या निर्णयामध्ये जिल्हा परिषदेने तत्काळ उपाययोजना म्हणून ५० टक्के विद्युत बिलाचा भरणा महावितरणला करून पाणीपुरवठा सुरू करावा. तसेच ४ ऑक्टोबरला आपले म्हणणे सादर करावे असे निर्देश दिले. आता उच्च न्यायालयाच्या आदेशावरून जिल्हा परिषद येणाऱ्या दिवसांत ५० टक्के विद्युत बिल भरून योजना सुरू करणार की नाही, याकडे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे.

Story img Loader