लोकसत्ता टीम

नागपूर: पावसाळापूर्व करावयाच्या कामाचा एक भाग म्हणून रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या फांद्याची कापणी केली जाते. मात्र त्याचा कचरा वेळीच उचलला जात नसल्याने त्याचा त्रास परिसरात राहणाऱ्या लोकांना व रस्त्यावरून जाणाऱ्यांना नागरिकांना सहन करावा लागतो.

Police officer beats up police inspector in nagpur
पोलीस निरीक्षकाला दिला कर्मचाऱ्याने चोप
congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार…
Non-vegetarian food in Samruddhi Mini Saras exhibition being held under Umed Mission
खेकडा कढी, बटेर हंडी… शासनाच्या प्रदर्शनात चक्क मांसाहाराचा ‘सरस’ तडका…
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Woman with baby in babys belly gives birth safely
‘फिट्स इन फिटू’ : ‘त्या’ महिलेची प्रसूती सुखरूप! पोटातील बाळाची शस्त्रक्रिया…
Anti-conversion law soon in Maharashtra and Bangladeshis Rohingyas will be sent back says Nitesh Rane
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा, बांगलादेशी, रोहिंग्याना परत पाठवू – नितेश राणे
Toll booths on Samriddhi Highway are closed here is the reason
Samriddhi Highway : समृध्दी महामार्गावरील टोल नाके बंद, काय आहे कारण? प्रवाशांना भुर्दंड का?
no alt text set
‘एमपीएससी’ प्रश्नपत्रिकेचे आमिष प्रकरणी नागपूरमधून आणखी दोघे अटकेत
will be Rohit Sharma and Virat Kohlis last match at Nagpur ground
रोहित शर्मा, विराट कोहलीचा नागपूरच्या मैदानावर अंतिम सामना?

दक्षिण नागपूर प्रभाग ३४ मानेवाडा रिंगरोड वरील मानेवाड चौक ते तुकडोजी पुतळा चौक या दरम्यान रस्त्यालगत दोन्हीही बाजूच्या झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या. फांद्याचा ढिग तयार करून त्याच झाडाखाली ठेवण्यात आला.तो अद्याप उचलला नाही. याचा फटका रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना व वाहन चालकांना बसत आहे. यामुळे अपघातही होऊ शकतो, अशी तक्रार या भागातील नागरिकांची आहे.

हेही वाचा… अमरावतीच्या युवकांची शरद पवारांना धमकी, मात्र २०११ मध्ये ते कृषिमंत्री पदावर असताना दिल्लीत नेमके काय घडले होते?

रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम झाल्यानंतर कचरा तातडीने उचलणे अपेक्षित आहे. मानेवाडा रिंगरोडच नव्हे तर शहराच्या इतरही भागात अशीच स्थिती आहे. वादळामुळे किंवा तत्सम कारणामुळे रस्त्यावर पडलेली झाडे तत्काळ बाजूला केली जातात, मात्र नंतर ती रस्त्याच्या बाजूलाच अनेक दिवस पडलेली असतात. वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिका जी तत्परता दाखवते तिच तत्परता त्यांनी झाडे उचलण्यासाठीही दाखवावी,अशी मागणी नागरिकांची आहे.

Story img Loader