वर्धा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विनोबा-गांधी विचारांचे कृतिशील विचारवंत, लेखक, संशोधक पद्मश्री डॉ अभय बंग हवेत अशी मागणी आता समोर आली आहे. आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलन जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वर्धा येथे होऊ घातले आहे. साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात अनेक नावे समोर येत आहेत. अध्यक्ष पदासाठी एक पेक्षा अधिक दावेदार राहिल्यास निवडणूक होईल, राजकारण होईल. परंतु गांधी विनोबांच्या विचारावर मार्गक्रमण करीत सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास करणारे, गांधी विनोबांच्या विचारांचे कृतिशील विचारवंत लेखक व संशोधक म्हणून डॉक्टर अभय बंग यांची सर्वसहमतीने निवड व्हावी अशी मागणी आता समोर आली आहे. अनेकांनी लोकसत्ता जवळ ही मागणी बोलून दाखवली आहे. मात्र डॉ. बंग यांच्याकडून अजूनही त्याबाबत अधिकृत काहीही बोलले गेले नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेकांनी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे असेही म्हटले आहे.माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकाने डॉक्टर अभय बंग घरोघरी पोचलेले आहे. वैद्यकीय जगताबरोबरच अनेक सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांवर डॉक्टर बंग यांचे चिंतन व कृती महत्त्वपूर्ण आहे. १९९३ मध्ये लोकचळवळीच्या माध्यमातून डॉ.अभय बंग यांच्या नेतृत्वात लागू झालेली दारूबंदी,अनेक साहित्यकृती,वैचारिक दिशा देणारे लेख डॉ. अभय बंग यांचे नावे आहेत.गांधी विनोबांच्या कर्मभुमीत वर्धा येथे होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गांधी विनोबा विचारांचे पाईक असलेले अभय बंग हेच सर्वथा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, ही सर्वांना कळकळीची विनंती आहे असे आवाहन गडचिरोलीतील सामाजिक कार्यकर्ते सूर्यप्रकाश गभने यांनी केली आहे.

Patangrao Kadam memorial site will be inaugurated tomorrow print politics news
डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळाचे उद्या लोकार्पण; राहुल गांधी यांची उपस्थिती
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Tanaji Sawant and ajit pawar
अजित पवार म्हणाले “तर …माझे पण  कार्यकर्ते त्यांच्या विरोधात बोलू शकतात,”
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Help of Mandal workers to clear the bottleneck in the festival assurance of Mandal workers
उत्सवातील कोंडी हटविण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची मदत, मंडळांच्या कार्यकर्त्यांचे आश्वासन
What Imtiyaz Jaleel Said?
Imtiyaz Jaleel : “उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लिम मतं चालतात पण मग..”, इम्तियाज जलील यांचा सवाल
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare
“…तर १५०० परत घेऊ”, रवी राणांच्या विधानावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “महायुतीच्या सरकारने…”
sharad Pawar car stopped Shouting in front of Ashok Chavan Nana Patole
मराठा आंदोलकांचा राजकीय नेत्यांना घेराव,शरद पवार यांची गाडी अडवली; अशोक चव्हाण, नाना पटोले यांच्यासमोर घोषणाबाजी