वर्धा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विनोबा-गांधी विचारांचे कृतिशील विचारवंत, लेखक, संशोधक पद्मश्री डॉ अभय बंग हवेत अशी मागणी आता समोर आली आहे. आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलन जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वर्धा येथे होऊ घातले आहे. साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात अनेक नावे समोर येत आहेत. अध्यक्ष पदासाठी एक पेक्षा अधिक दावेदार राहिल्यास निवडणूक होईल, राजकारण होईल. परंतु गांधी विनोबांच्या विचारावर मार्गक्रमण करीत सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास करणारे, गांधी विनोबांच्या विचारांचे कृतिशील विचारवंत लेखक व संशोधक म्हणून डॉक्टर अभय बंग यांची सर्वसहमतीने निवड व्हावी अशी मागणी आता समोर आली आहे. अनेकांनी लोकसत्ता जवळ ही मागणी बोलून दाखवली आहे. मात्र डॉ. बंग यांच्याकडून अजूनही त्याबाबत अधिकृत काहीही बोलले गेले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा