लोकसत्ता टीम

नागपूर: शहर भौगोलिकदृष्ट्या मध्यभागी आहे. वन, पर्यावरण, नैसर्गिक सौंदर्य, भौगोलिक संपन्नता आणि उदात्त जीवनमूल्याचे शहर म्हणून या शहराचा जगभर गौरव आहे. तसेच परकीय आक्रमणापासून सर्वात सुरक्षित आहे. या सर्व बाबींचा विचार करता नागपूरला भारताची राजधानी करावे, अशी मागणी पीपल्स पँथरचे अध्यक्ष अशोक मेश्राम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

Dharmaraobaba Atram is nominated from Aheri by NCP and BJPs claim is futile
‘अहेरी’तून धर्मरावबाबा आत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी, भाजपाचा दावा निष्फळ
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Ladki Bahin Yojana petitioner Anil Wadpalliwar claims that his life has been threatened
‘लाडकी बहीण योजना’ याचिकाकर्त्यांचा खळबळजनक दावा, म्हणाले “माझ्या जीवाला…”
state government announced Parashuram Economic Development Corporation electing Ashish Damle president
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले
Pune Municipal Corporation demanded the state government to issue notification of city hawker committee
फेरीवाला समितीची अधिसूचना काढा, कोणी केली ही मागणी
countrys first constitution building in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील पहिले संविधान भवन
pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
Cm Eknath Shinde at davos
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची स्वित्झर्लंड दौऱ्यात १.५८ कोटींची उधारी, कंपनीनं पाठवली कायदेशीर नोटीस

यावेळी सरचिटणीस डॉ. भीमराव म्हस्के, कोर कमेटीचे नेते ॲड. लटारी मडावी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ऐतिहासिक भूमीत १४ आक्टोबर १९५६ रोजी बुद्ध धम्मक्रांतीचे चक्र गतिमान केले. दहाव्या शतकात आदिवासी गोंड राजा बक्त बुलंद शहा (उईके ) यांनी नागपूर शहराची पुर्नस्थापना केली. या शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वेगळपण लाभले आहे.

आणखी वाचा- किळसवाणे! प्रेयसीच्या मुलीवरच नराधमाचा बलात्कार

दिल्ली व मुंबई हे दोन शहर औद्योगिक शहर आहेत तर नागपूर देशाच्या मध्यभागी व सर्वाधिक सुरक्षित आहे. शिवाय, टायगर कॅपिटल, रिझर्व बँक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, नोबल विजेते रामण विज्ञान केंद्र, संत्रा नगरी, मल्टी मॉडेल आंतरराष्ट्रीय कार्गो हब व सर्व राज्यांना जवळ पडेल असे हे शहर असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.