लोकसत्ता टीम

वर्धा : मतदानास एक तास बाकी असताना जवळपास ५७ टक्के मतदानाची नोंद पाच वाजेपर्यंत झाल्याने विक्रमी मतदान नोंदल्या जाण्याची शक्यता व्यक्त होते.

Administrative approval for road works affected by heavy rain Funding in Vikramgarh Assembly Constituency Palghar
पालघर: पाऊस सर्वत्र मात्र अतिवृष्टी विक्रमगड विधानसभा क्षेत्रातच !
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण
Krushi Sevak, Krushi Sevak posts,
मोठी बातमी! २५ ऑगस्टच्या परीक्षेत कृषी सेवकांचा २५८ पदांच्या समावेशासंदर्भात महत्त्वाचा….
Badalapur Crime News
Badlapur Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक, आत्तापर्यंत काय काय घडलं?
earthquake dahanu marathi news
पालघर: डहाणू तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के
Kalyan, Dombivli, online investment fraud, Information Technology Act, Manpada police, fraud news, latest news, stock market fraud,
डोंबिवली, कल्याणमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीतून सव्वा कोटीची फसवणूक
Goods exports down 1 2 percent in July
वस्तू निर्यातीत जुलैमध्ये १.२ टक्क्यांची घट; व्यापार तुटीत २३.५ अब्ज डॉलरपर्यंत विस्तार

सकाळपासूनच मतदानाने वेग घेतला. दुपारच्या रणरणत्या उन्हातदेखील ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. मात्र पुरूषांच्या तुलनेत महिलांची उपस्थिती कमी असल्याचे चित्र होते. शहरी मतदान केंद्रापेक्षा ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर अधिक उत्साह दिसून आला. एकाच वेळी एका कुटुंबातील तीनही पिढ्या मतदान करण्यास पोहचल्याचे दृष्य काही ठिकाणी दिसून आले. आज लग्नतिथी असल्याचे बोलल्या जात होते. त्यामुळे मतदानावर विपरीत परिणाम होण्याची भिती व्यक्त झाली. मात्र, तसे न होता नवरदेवासह लग्नास जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळींनी प्रथम मतदानाचा हक्क बजावला आणि नंतरच गाव सोडले. नवमतदार, दिव्यांग, तृतीयपंथी, वयस्कर अश्या सर्वच घटकांची उपस्थिती मतदान केंद्रावर दिसून आली.

आणखी वाचा-बुलढाणा : मतदानयंत्र बिघडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदान खोळंबले… यंत्रणांची धावपळ…

सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ५६.६७ टक्के मतदान झाले. १६ लाख ८२ हजार ७७१ मतदारांपैकी ९ लाख ५३ हजार ५५३ मतदारांनी पाच वाजेपर्यंत मतदान केले होते. आर्वी सर्वाधिक म्हणजे ६०.८५ टक्के मतदान झाले. धामनगाव- ५३.५८, मोर्शी – ५७.६०, देवळी – ५७.११, हिंगणघाट – ५५.४८ व वर्धा – ५६.६ टक्के मतदान झाले. झालेल्या मतदानात ५९.३० टक्के मतदान पुरूषांचे तर ५३.९२ मतदान महिला मतदारांचे होते. यात सहा तृतीयपंथी मतदार आहे. मतदानाच्या मुदतीनंतर नेमकी आकडेवारी पुढे येईल.