नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखोंचा जनसागर उसळतो. देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी रेल्वेच्या माध्यमातून नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र या गर्दीमुळे रेल्वेतील सामान्य प्रवाशांना त्रास होतो. रेल्वे प्रशासनाने यावर उपाययोजना करायला हवी, या आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

अ‍ॅड. अविनाश काळे यांनी ही याचिका दाखल केली असून उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला याबाबत १८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. मागील वर्षी अनुयायांची ट्रेनमध्ये अतिशय गर्दी असल्यामुळे काळे यांना प्रवासादरम्यान गैरसोयीचे वाटले, तसेच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. रेल्वे प्रशासनाच्यावतीने ट्रेनमध्ये कोणतीही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेली नव्हती, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

parmeshwar yadav, judicial custody, Shivaji maharaj statue Rajkot fort,
शिवपुतळा दुर्घटनेतील तिसरा आरोपी परमेश्वर यादव याला २५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Jai Bhim Nagar, huts in Jai Bhim Nagar,
मुंबई : जयभीमनगर प्रकरण; झोपड्यांवर कारवाई करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
sharad pawar approaches supreme court over clock symbol print politics
घडयाळ चिन्हाबाबत १५ ऑक्टोबरला सुनावणी; चिन्हाचा वापर करण्यास मनाई करण्याची न्यायालयाला विनंती
school president secretary arrested after 44 days in badlapur sexual assault case
बदलापूर प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष, सचिव अखेर अटकेत; ४४ दिवसांनी आरोपींना बेड्या, परिमंडळ ४ पोलिसांची कारवाई
bombay high court denies foreign travel permission to indrani mukherjea
इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीस उच्च न्यायालयाचा नकार; सीबीआयची विरोध करणारी याचिका योग्य ठरवली
Mumbai University General Assembly Election result today Mumbai
अधिसभा निवडणुकीचा निकाल आज; याचिकाकर्त्यांची स्थगितीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
Kalyaninagar accident case Report by Police to Juvenile Justice Board against minor Pune news
अल्पवयीनाविरुद्ध बाल न्याय मंडळात पोलिसांकडून अहवाल; कल्याणीनगर अपघात प्रकरण

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू जैनचे न्यायालयात आत्मसमर्पण

हेही वाचा – अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपुरात या पदार्थांवर ताव मारणार, म्हणाली…

रेल्वे प्रशासनाकडे रीतसर तक्रार करूनही काही उपाययोजना न केल्याने ॲड. काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रकरणावर १८ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते अ‍ॅड. काळे यांच्यातर्फे अ‍ॅड. एस. जी. करमरकर तर केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. नंदेश देशपांडे बाजू मांडतील.