Pitru Paksha 2023 All Date, Rituals and Significance : अनंत चतुर्दशीच्या पोर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष सुरु होतो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंतच्या काळाला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हणतात. यंदा पितृपक्ष २९ सप्टेंबर २०२३ पासून १४ ऑक्टोबर या कालावधीत आहे. या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राध्द, महालय आदिविधी केले जातात. पितृपक्षात केलेल्या तर्पणामुळे पूर्वजांचा आशिर्वाद मिळतो आणि घरात कायम सुख-शांती नांदते, असे मानले जाते.

पूर्वजांच्या मृत्यूची जी तिथी असेल, त्या तिथीला पितृपक्षात त्यांच श्राध्द केल जात. त्याला महालय असं म्हणतात. ज्यांच्या मृत्यूची तिथी माहिती नसते किंवा त्या तिथीला महालय करणे शक्य होत नाही त्यांचा महालय सर्वपित्री अमावस्येला (भाद्रपद अमावस्या) केला जातो. पूर्ण पितृ पंधरवाड्यात महालय करणं शक्य झाले नाही तर पंचागात दिलेल्या महालय समाप्तीच्या कालावधीपर्यंत महालय श्राध्द करता येते. महालय श्राध्द म्हणजे अशी एक पध्दत आहे की त्यातून पूर्वजांना सांगीतल जातं, की ते आजही परिवाराचा अविभाज्य घटक आहेत.

Cm Devendra Fadnavis in loksatta events
‘वर्षवेध’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन; स्पर्धा परीक्षांचा ‘वाटाड्या’ पूर्णपणे नव्या स्वरूपात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
Bhandara district Pimpalgaons Shankarpata completes 100 years on Vasant Panchami February 2 2025
पिंपळगावातील शंकरपट झाला शंभर वर्षांचा
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
ISS Mahakumbh
Mahakumbh 2025 : लखलखता महाकुंभ! रात्रीच्या अंधारात उजाळून निघालीय गंगा नदी; अंतराळातून काढलेले फोटो तर पाहा!
Mora Mumbai Ro Ro service to be operational by March 2026
मोरा-मुंबई रो रो सेवा मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित; अनेक महिने बंद असलेले काम पुन्हा सुरू

हेही वाचा : ट्रक ड्रायव्हरचा मुलगा निघाला लंडनला, बल्लारपूरच्या ध्येयवेड्या जयची सातासमुद्रापार शिक्षणवाट

पितृपक्षाचे महत्त्व

श्राध्द झालं नाही, तर आत्म्याला पूर्ण मुक्ती मिळत नाही असेही म्हणतात. पितृपक्षात नियमितपणे दानधर्म करण्यामुळे कुंडलीतील पितृदोष दूर होतो, अशी समाजात धारणा आहे. पितृपक्षात श्राध्द आणि तर्पणाचे खास महत्व असते. त्यामुळे पितर प्रसन्न होतात. आणि आशिर्वाद देतात. पूर्वजांच्या कृपेमुळे आपल्या वर्तमान आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी दूर होतात . व्यक्तीला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते असे ही आपलेच घरची वडीलधारी मंडळी सांगतात. पितृपक्षात पूर्वजांच स्मरण केलं जातं. त्याला श्राध्द म्हणतात. पिंडदान म्हणजे आपल्या पितरांना खाऊ घालणं. आपण चपाती, भात वगैरे खातो. तसेच पूर्वजांना पिंडाच्या रुपाने भोजन अर्पण केलं जातं. तर्पण दर्भाने केले जाते. त्याचा अर्थ आहे पितरांना पाणी पाजणं, असे सांगण्यात येते. भारतात विविध समाज पितृपक्ष आपापल्या समाजातील पद्धतींप्रमाणे करतात.

Story img Loader