प्रमोद खडसे

वाशीम : पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन खाते काढून त्यांना मृद व जलसंधारण खात्याचे मंत्री करण्यात आले आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहिर झाल्यानंतर राज्यातील पालकमंत्री बदलण्याचे संकेत दिले आहेत. संजय राठोड यांनी वाशीमच्या पालकत्वाची जबाबदारी स्विकारल्यानंतर कायमच त्यांनी वाशीमकडे दुर्लक्ष केले असून त्यांच्याविषयी जिल्हयात प्रचंड नाराजी असून जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होईल. यावरून तर्क वितर्क लावले जात आहेत.

Sanjay Dutt
संजय दत्तच्या चाहतीने त्याच्या नावावर केली होती ७२ कोटींची संपत्ती; कारण काय?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान
Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
Maharashtra Disaster Management Authority Mahayuti govt
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवारांची निवड; महायुतीत नाराजी कायम?
forest minister ganesh naik made statement saying if necessarywe will hold meeting of officials to resolve hurdles in city
वनमंत्री गणेश नाईक म्हणतात, ठाणे सर्वांचेच…गरज पडली तर बैठक घेऊ…
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात

प्रशासकीय व्यवस्था गतीमान होऊन सामान्य जनतेला वेळेत न्याय मिळावा, शासकीय योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी व्हावी, प्रशासनावर सरकारचा अंकुश रहावा यासह विविध कारणास्तव विधिमंडळ शासकीय व्यवस्थेमध्ये मंत्रीमंडळातील मंत्रयाना जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात येते. वाशीम जिल्हयाच्या पालकत्वाची जबाबदारी शिंदे फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांच्याकडे सोपविण्यात आली होती. ते शेजारील जिल्हयातील असल्यामूळे वाशीमला वेळ देऊ शकतील, अशी जिल्हावासीयांना आशा होती. मात्र जिल्हावासीयांची आशा फोल ठरली आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पुलावर पाणी असल्याने नागभीड-उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद

त्यापुर्वी महा विकास आघाडी सरकार मध्ये जिल्हयाला लाभलेले सातारचे सुपुत्र शंभुराज देसाई यांच्याकडे पालकत्वाची जबाबादारी होती. मात्र ते देखील झेंडा टू झेंडाच जिल्हयात फिरकायचे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहभागी झाल्यानंतर नव्याने मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. मंत्रयांना खातेवाटप देखील जाहिर झालेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पालकमंत्री बदलाचे संकेत दिले असल्याने जिल्हा वासियांच्या आशा पल्लवित झाल्या असून जिल्ह्याला वेळ देईल असाच पालकमंत्री देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Story img Loader