प्रमोद खडसे

वाशीम : पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन खाते काढून त्यांना मृद व जलसंधारण खात्याचे मंत्री करण्यात आले आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहिर झाल्यानंतर राज्यातील पालकमंत्री बदलण्याचे संकेत दिले आहेत. संजय राठोड यांनी वाशीमच्या पालकत्वाची जबाबदारी स्विकारल्यानंतर कायमच त्यांनी वाशीमकडे दुर्लक्ष केले असून त्यांच्याविषयी जिल्हयात प्रचंड नाराजी असून जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होईल. यावरून तर्क वितर्क लावले जात आहेत.

readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : सिंह यांचा राजीनामा घेणेच हिताचे
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
Vijay Wadettiwar On Sanjay Rathod
Vijay Wadettiwar : “मुख्यमंत्र्यांचा ‘लाडका मंत्री’ असतो तेव्हा काय होऊ शकतं? बघा…”, वडेट्टीवारांची मुख्यमंत्री शिंदेंसह मंत्री राठोडांवर टीका
ashish shelar replied to mamata banerjee
Ashish Shelar : “तुमचा मुलगा खूप…”, ममता बॅनर्जींकडून अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न; आशिष शेलारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

प्रशासकीय व्यवस्था गतीमान होऊन सामान्य जनतेला वेळेत न्याय मिळावा, शासकीय योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी व्हावी, प्रशासनावर सरकारचा अंकुश रहावा यासह विविध कारणास्तव विधिमंडळ शासकीय व्यवस्थेमध्ये मंत्रीमंडळातील मंत्रयाना जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात येते. वाशीम जिल्हयाच्या पालकत्वाची जबाबदारी शिंदे फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांच्याकडे सोपविण्यात आली होती. ते शेजारील जिल्हयातील असल्यामूळे वाशीमला वेळ देऊ शकतील, अशी जिल्हावासीयांना आशा होती. मात्र जिल्हावासीयांची आशा फोल ठरली आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पुलावर पाणी असल्याने नागभीड-उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद

त्यापुर्वी महा विकास आघाडी सरकार मध्ये जिल्हयाला लाभलेले सातारचे सुपुत्र शंभुराज देसाई यांच्याकडे पालकत्वाची जबाबादारी होती. मात्र ते देखील झेंडा टू झेंडाच जिल्हयात फिरकायचे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहभागी झाल्यानंतर नव्याने मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. मंत्रयांना खातेवाटप देखील जाहिर झालेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पालकमंत्री बदलाचे संकेत दिले असल्याने जिल्हा वासियांच्या आशा पल्लवित झाल्या असून जिल्ह्याला वेळ देईल असाच पालकमंत्री देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.