चंद्रपूर : फेब्रुवारी महिना संपण्यास आणखी आठवडाभराचा अवधी असला तरी चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यंदा तीव्र पाणी टंचाईची झळ बसेल, असा इशारा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाने दिला आहे. १०८.४५ टक्के पाऊस झाला असला तरी नऊ तालुक्यांतील भूजलपातळीत घट झाल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार ४० मि.मी. आहे. २०२२-२३ यावर्षी जिल्ह्यात ११२० मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाची टक्केवारी १०८.४५ इतकी आहे. पर्जन्यमानात वाढ झाली असली तरी नऊ तालुक्यांतील भूजलपातळीत घट झाली असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
ISS Mahakumbh
Mahakumbh 2025 : लखलखता महाकुंभ! रात्रीच्या अंधारात उजाळून निघालीय गंगा नदी; अंतराळातून काढलेले फोटो तर पाहा!
Loksatta Chatura Nature Change of seasons and moments of joy in the garden
निसर्गलिपी: ऋतू बदल आणि बागेतील आनंदाचे क्षण

हेही वाचा – नागपूर : चोरी करण्यापूर्वीच चोरट्यांच्या हातात बेड्या, झाले असे की…

हेही वाचा – नागपूर : राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने उपराजधानीत गुटखा-तंबाखू तस्करी, वाडीत ५५ लाखांचा गुटखा जप्त

जिल्ह्यात १३४ निरीक्षण विहिरी आहेत. जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर महिन्यांत या निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीची नोंद घेतली जाते. यात सप्टेंबर महिन्यातील पाण्याच्या पातळीची नोंद महत्त्वाची असते. या महिन्याच्या नोंदीनुसार, जिल्हा प्रशासनाकडून टंचाईचे आराखडे तयार केले जातात. सप्टेंबर महिन्यात पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे. त्यात बल्लारपूर, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, मूल, सावली, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड आणि जिवती तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या तालुक्यांत पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader