नागपूर : राज्यातील काही भागात पावसाने उसंती दिली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वीच्या तुलनेत आताची स्थिती बघितल्यास विजेच्या मागणीत तब्बल ३ हजार मेगावॉटने वाढ झाली आहे. त्यामुळे बंद करावे लागलेले वीजनिर्मिती संच पुन्हा सुरू झाले आहे. दरम्यान पुन्हा पावसचा अंदाज असल्याने आता विजेच्या मागणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात ३० जुलैच्या दुपारी १.३० वाजताच्या सुमारास विजेची मागणी १९ हजार ८३२ मेगावॉट होती. या काळात सतत पडणाऱ्या पावसाने वातानुकूलित यंत्र, कुलर, पंखे, कृषी पंपासह विद्युत उपकरणांचा वापर कमी झाल्याचा हा परिणाम होता. काही दिवसांपासून विदर्भाच्या काही भागासह राज्यातील इतरही काही भागात पावसाने उसंत दिली आहे. त्यामुळे बुधवारी (१४ ऑगस्ट) राज्यात विजेची मागणी दुपारी २.०८ वाजता २२ हजार ८६२ मेगावॉट नोंदवली गेली. त्यापैकी २० हजार ५८१ मेगावॉट मागणी महावितरणची होती.

Despite government announcement smart prepaid meters are being distributed secretly causing unemployment for contract meter readers
राज्यभरात यंदा वीज देयक वेळेवर नाही… संतप्त कंत्राटी मीटर वाचक…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mahavitaran latest news in marathi
पुणे : घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात
Solar pumps of Sahaj and Rotosolar companies shut down in two days after installation
सहज व रोटोसोलर कंपन्याचे सौर पंप बसविल्यानंतर दोन दिवसांत बंद, शेतकऱ्यांची पिके जळाली
State Electricity Regulatory Commission imposes fine of Rs 1 lakh on Mahavitaran for new electricity connection without providing meter Mumbai news
मीटर न देताच नवीन वीजजोडण्या दिल्याने नाराजी; राज्य वीज नियामक आयोगाकडून महावितरणला एक लाख रुपये दंड
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
State government approves subsidy of Rs 165 crore for orange producers
संत्री उत्पादकांसाठी १६५ कोटींचे अनुदान, राज्यशासनाची मंजुरी
3000 kw of electricity generated from solar energy in raigad district
रायगड जिल्ह्यात सौर उर्जेतून ३ हजार किलोवॅट वीज निर्मिती

हेही वाचा >>> १८५७ ते १९४७! या टप्प्यातील इतिहास, जो कुठेच नाही तो येथे बघा…

मुंबईची मागणी २ हजार २७० मेगावॉट होती. राज्यात कृषी पंपासह वातानुकूलित यंत्र व विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने पुन्हा विजेची मागणी वाढली आहे. एकूण मागणीच्या तुलनेत १५ हजार १२३ मेगावॉट विजेची निर्मिती राज्यात होत होती. तर केंद्राच्या वाट्यातून राज्याला ७ हजार ७४० मेगावॉट वीज मिळत होती. राज्यात सर्वाधिक ८ हजार ३६६ मेगावॉट वीजनिर्मिती महानिर्मितीकडून होत होती. त्यात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ६ हजार ११० मेगावॉट, उरण गॅस प्रकल्पातील ३६३ मेगावॉट, जलविद्युत प्रकल्पातील १ हजार ८८३ मेगावॉट वीज निर्मितीचा समावेश होता. तर खासगी प्रकल्पांपैकी अदानीकडून २ हजार ८९१ मेगावॅट, जिंदलकडून ८५६ मेगावॅट, आयडियलकडून १ मेगावॅट, रतन इंडियाकडून ६३४ मेगावॅट, एसडब्ल्यूपीजीएलकडून ३४३ मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. या वृत्ताला महावितरण व महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

हेही वाचा >>> ‘लाडकी बहीण’ योजनेच्‍या समितीवर चक्‍क काँग्रेसच्‍या आमदार! या किमयेची चर्चा….

एप्रिल महिन्यात सर्वोच्च मागणीची नोंद महावितरणकडून यंदाच्या उन्हाळ्यात १७ एप्रिल २०२४ रोजी सर्वाधिक २५ हजार ६८ मेगावॉट विजेची मागणी नोंदवली गेली. तर २७ फेब्रुवारीला २५ हजार २३ मेगावॉट, २७ मार्चला २५ हजार ३५ मेगावॉट, १९ एप्रिलला २४ हजार ८०५ मेगावॉट, २२ मे रोजी २४ हजार ६०४ मेगावॉट, ३ जूनला २४ हजार ४४३ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली गेली. परंतु आता ही मागणी कमी झाली आहे. तर अधून- मधून एक- दोन दिवस पाऊस लांबल्यास पून्हा मागणीमध्ये वाढही नोंदवली जात असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

Story img Loader