अकोला : पावसामुळे किंवा इतर कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना काळजी करण्याचे कारण नाही. तक्रार करण्यासाठी ग्राहकांना महावितरणने टोल फ्री क्रमांक, मोबाइल ॲप, मिस कॉल व एसएमएसची सुविधा उपलब्ध करून ‍दिली आहे. ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार याच पर्यायांद्वारे करावी, असे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.

मिस कॉलद्वारे तक्रार करण्यासाठी ०२२-५०८९७१०० हा क्रमांक असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा आणि ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा. या पद्धतीने किंवा http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कंज्युमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल ॲप अथवा १९१२, १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल-फ्री क्रमांकांवर मोबाईल क्रमांक नोंदवता येतो.

Despite government announcement smart prepaid meters are being distributed secretly causing unemployment for contract meter readers
राज्यभरात यंदा वीज देयक वेळेवर नाही… संतप्त कंत्राटी मीटर वाचक…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
TRAI intervention: Jio, Airtel, Vi launch revised voice-only recharge plans
युजर्ससाठी आनंदाची बातमी; महागड्या रिचार्जपासून दिलासा! TRAI च्या कारवाईनंतर Jio-Airtel-VI-BSNL ने कमी केल्या किंमती
mahavitaran latest news in marathi
पुणे : घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात
pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : नळजोड तोडणीबाबतचे ‘एसएमएस’ फसवणुकीचे; महापालिकेने केले ‘हे’ आवाहन
State Electricity Regulatory Commission imposes fine of Rs 1 lakh on Mahavitaran for new electricity connection without providing meter Mumbai news
मीटर न देताच नवीन वीजजोडण्या दिल्याने नाराजी; राज्य वीज नियामक आयोगाकडून महावितरणला एक लाख रुपये दंड
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी

हेही वाचा – लाचखोरीत महसूल आणि पोलीस विभाग अव्वल! नाशिक पहिल्या तर पुणे द्वितीय स्थानावर

याशिवाय NOPOWER टाईप करून व स्पेस देऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाकावा. हा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवून खंडित वीजपुरवठ्याची माहिती देता येईल. स्वयंचलित प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून ग्राहकांना संदेश पाठवण्यात येतो. संबंधित क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वयंचलित प्रणालीमार्फत सूचना जाऊन वीजपुरवठा सुरळीत केला जातो. याशिवाय महावितरणचे मोबाईल ॲप तसेच टोल फ्री क्रमांकावर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच ग्राहक महावितरणच्या वेबसाईटवरील वेब सेल्फ सर्व्हिसवरही खंडित वीजपुरवठ्याची माहिती देऊ शकतात.

हेही वाचा – खळबळजनक! नोकरीसाठी नागपुरात आलेल्या महिलेवर ‘गँगरेप’

पावसाळ्यात वादळ-वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. तथापि, ग्राहकांनी १५ ते २० ‍मिनिटे वाट पाहूनच महावितरणला माहिती द्यावी. ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, एसएमएस किंवा मिस कॉल सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले.

Story img Loader