अकोला : काँग्रेस पक्ष विकास करू शकत नाही. विकास कार्य फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात. त्यामुळे काँग्रेसमधील उर्वरित चांगले नेतेसुद्धा भाजपमध्ये येतील. गेले ४०-५० वर्ष जे काँग्रेसला जमले नाही, ते विकास कार्य भाजपने केले आहे, असा दावा भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे आज केला.

अकोल्यातील खुले नाट्यगृहात आयोजित महायुतीच्या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेश चिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार तथा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार तुकाराम बिडकर, अनुप धोत्रे आदींसह घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

हेही वाचा – अमरावती लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचा दावा; महायुतीत बेबनाव

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, आता राजकारणाची दिशा बदलली. नव्या पिढीला विकासाची भाषा कळते. जातीपातीचे राजकारण नव्या पिढीला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला विकासाचे राजकारण दाखवले. त्या भरवशावर निवडणुका जिंकून दाखवल्या. विकासाच्या बाजूने उभे राहण्यासाठी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे व अजित पवार सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ तास जनतेसाठी काम करणारे नेता आहेत. विकासाची दृष्टी देवेंद्र फडणवीसांनी दाखवली. अजित पवारांची प्रशासनावर पकड आहे. तिन्ही बलाढ्य नेते आज महायुतीत विकासासाठी एकत्र आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एकदिलाने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज तयार आहे. राज्यात महायुतीचे समन्वयातून कार्य सुरू आहे. सरकारची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मेळावे घेतले जात आहे. समाजाचा विकास हा अंतिम उद्दिष्ट असतो. सरकार व नेतृत्व आपल्याकडे आहे. विकासाच्या मुद्यावर सर्वांनी एकत्र येत काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांचा राष्ट्रवादीचा पक्ष गेला. आज काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. आता काँग्रेसलासुद्धा घरघर लागली आहे. विकासाच्या राजमार्गावर येण्यासाठी ते आपल्या सोबत आले. हळूहळू काँग्रेसमधील इतर चांगले नेतेसुद्धा भाजपमध्ये येतील, असे प्रवीण दरेकर म्हणाले. यावेळी विविध नेत्यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – “राहुल गांधी देशात जातीय द्वेष पसरविण्याचे काम करीत आहे”, महायुतीच्या मेळाव्यात सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात

विकासासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची ‘दिल्लीवारी’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून वारंवार दिल्लीला जातात म्हणून टीका केली जाते. घरात बसून राहणाऱ्यांना काय कळणार? महायुतीचे नेते दिल्लीवारी करून राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भरभरून निधी घेऊन येतात, असे आमदार प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केले.

Story img Loader